शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:33 IST

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे.

Sanjay Raut News: महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्ये डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही बॅनर राजस्थानात लावण्यात आले होते. यावेळी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजस्थान भाजपला महाराष्ट्रात काय चालले आहे, हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील. महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजले जाते ते बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करतात. हिंदुहृदयसम्राट या देशात दोनच आहेत, एक स्वातंत्र्यीवर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर कुणीही ही पदवी घेऊ शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष आणि काम खूप मोठे होते, या शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 

गद्दारांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा 

एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील पण त्यांनी असे काय महान कार्य केले आहे ते आम्हाला पाहावे लागेल. सन्मानीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पाहावे लागेल, या शब्दांत संजय राऊत हल्लाबोल केला. 

दरम्यान, चार दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावे लागले. याबाबत कुणीही संवदेना व्यक्त केली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेसमुक्त भारत आणि शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा होता पण ते झाले नाही. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक