शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:33 IST

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे.

Sanjay Raut News: महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्ये डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही बॅनर राजस्थानात लावण्यात आले होते. यावेळी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजस्थान भाजपला महाराष्ट्रात काय चालले आहे, हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील. महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजले जाते ते बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करतात. हिंदुहृदयसम्राट या देशात दोनच आहेत, एक स्वातंत्र्यीवर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर कुणीही ही पदवी घेऊ शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष आणि काम खूप मोठे होते, या शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 

गद्दारांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा 

एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील पण त्यांनी असे काय महान कार्य केले आहे ते आम्हाला पाहावे लागेल. सन्मानीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पाहावे लागेल, या शब्दांत संजय राऊत हल्लाबोल केला. 

दरम्यान, चार दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावे लागले. याबाबत कुणीही संवदेना व्यक्त केली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेसमुक्त भारत आणि शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा होता पण ते झाले नाही. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक