शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:12 IST

Sanjay Raut Vs PM Modi Govt: पंतप्रधानांना राजकीय पक्ष तोडायला, निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut Vs PM Modi Govt: ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेटवरील बंदी पुन्हा एकदा वाढवली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी आता १० जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंदी पाच दिवसांनी वाढवण्यात आली ​​आहे. मणिपूरमध्ये ०३ मे रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षात जवळपास १२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सरकारकडे स्पष्ट उत्तर आणि जबाबदारीची मागणी करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा

मणिपूरची स्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. केंद्र सरकार मणिपूरकडे बघायलाही तयार नाही. विरोधी पक्ष फोडण्यात, २०२४ च्या निवडणुकीत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सरकार व्यस्त आहेत. पण मणिपूर जळत आहे, लोक मारले जात आहेत. पण नरेंद्र मोदी बोलत नाही. इंटरनेट तोडले म्हणजे मणिपूरला देशाशी तोडले जात आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. तिथून लक्ष हटवण्याकरता हा पक्ष तोडा तो पक्ष तोडा हे सुरू आहे. पंतप्रधानांना इतर राजकीय पक्ष तोडायला वेळ आहे. निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मणिपूरमध्ये चीनचे अतिरेकी घुसले आहेत, असा दावा करत, पाकिस्तानला उठसूठ दम देताय, एकदा चीनला दम देऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे. 

दरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय फुटबॉल संघाच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी वेळ काढला, याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान वाटला, पण मणिपूरच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले आहे. मणिपूरचे तीन फुटबॉलपटू या संघाचा भाग आहेत आणि पंतप्रधानांचे मौन त्या सर्वांना दुखावते, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकार