शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:12 IST

Sanjay Raut Vs PM Modi Govt: पंतप्रधानांना राजकीय पक्ष तोडायला, निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut Vs PM Modi Govt: ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेटवरील बंदी पुन्हा एकदा वाढवली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी आता १० जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंदी पाच दिवसांनी वाढवण्यात आली ​​आहे. मणिपूरमध्ये ०३ मे रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षात जवळपास १२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सरकारकडे स्पष्ट उत्तर आणि जबाबदारीची मागणी करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा

मणिपूरची स्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. केंद्र सरकार मणिपूरकडे बघायलाही तयार नाही. विरोधी पक्ष फोडण्यात, २०२४ च्या निवडणुकीत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सरकार व्यस्त आहेत. पण मणिपूर जळत आहे, लोक मारले जात आहेत. पण नरेंद्र मोदी बोलत नाही. इंटरनेट तोडले म्हणजे मणिपूरला देशाशी तोडले जात आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. तिथून लक्ष हटवण्याकरता हा पक्ष तोडा तो पक्ष तोडा हे सुरू आहे. पंतप्रधानांना इतर राजकीय पक्ष तोडायला वेळ आहे. निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मणिपूरमध्ये चीनचे अतिरेकी घुसले आहेत, असा दावा करत, पाकिस्तानला उठसूठ दम देताय, एकदा चीनला दम देऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे. 

दरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय फुटबॉल संघाच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी वेळ काढला, याबद्दल आम्हा सर्वांना अभिमान वाटला, पण मणिपूरच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगले आहे. मणिपूरचे तीन फुटबॉलपटू या संघाचा भाग आहेत आणि पंतप्रधानांचे मौन त्या सर्वांना दुखावते, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकार