शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

Maharashtra Politics: “महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु, मोठ्या घोषणा करतायत म्हणजे विधानसभा निवडणूक लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:29 IST

Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले.राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर अन्य काही प्रकल्पही राज्याबाहेर गेले. यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातील बहुतांश प्रकल्प गुजरात गेले आहेत. यातच गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठीही केंद्राकडून काही प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, याचाच अर्थ कदाचित महाराष्ट्रातही आता विधानसभा निवडणूक लागेल, असे मोठे भाकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यात विधानसभा निवडणूक लागू शकते, असा दावा केला आहे. 

कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल

महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल. गुजरातचे प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत आहेत, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला. 

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्यात यंदा ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ‘महासंकल्प’ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. येत्या आठवडाभरात १८ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. तसेच महिनाभरात ग्रामविकास विभागात १० हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार