शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Maharashtra Politics: “महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु, मोठ्या घोषणा करतायत म्हणजे विधानसभा निवडणूक लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:29 IST

Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले.राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर अन्य काही प्रकल्पही राज्याबाहेर गेले. यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातील बहुतांश प्रकल्प गुजरात गेले आहेत. यातच गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठीही केंद्राकडून काही प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, याचाच अर्थ कदाचित महाराष्ट्रातही आता विधानसभा निवडणूक लागेल, असे मोठे भाकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यात विधानसभा निवडणूक लागू शकते, असा दावा केला आहे. 

कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल

महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल. गुजरातचे प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत आहेत, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला. 

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्यात यंदा ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ‘महासंकल्प’ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. येत्या आठवडाभरात १८ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. तसेच महिनाभरात ग्रामविकास विभागात १० हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार