शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

“शेतकऱ्यांच्या घरी साधी पणती पेटली नाही, पंतप्रधानांनी बांधावर जावे अन्...”; ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 08:21 IST

Shiv Sena Thackeray Group Vs BJP: सैन्यतळावर जाऊन आपल्या पंतप्रधानांनी नवे काय सांगितले? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Shiv Sena Thackeray Group Vs BJP: दिवाळी सगळ्यांची गोड असावी. दिवाळी सगळ्यांनाच आरोग्याची, भरभराटीची असावी. दिवाळीचा आनंद एकतर्फी नसावा. दिवाळीच्या उत्साहात सगळ्यांनीच सामील व्हावे. पंतप्रधान लष्करी रंगभूषेत सैन्यतळावर जातात, तसे एका दिवाळीत त्यांनी खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे व कृषीप्रधान भारताच्या राष्ट्रनिर्मात्याची दुःखद कहाणी समजून घ्यावी. असंख्य शेतकऱ्यांच्या घरांत साधी पणतीही पेटलेली नाही, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

पंतप्रधान मोदी हे लष्करी गणवेषात जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसले. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील लष्करी तळावर पंतप्रधान पोहोचले. त्यांनी जवानांसोबत फराळ केला व देशाला माहीत नसलेली वेगळीच माहिती दिली. राष्ट्रनिर्माणात सैन्याचे योगदान अमूल्य असल्याची माहिती मोदी यांनी दिली. सैन्य आहे म्हणून आपला देश सुरक्षित आहे हे कुणालाच माहीत नसेल. सैन्यतळावर जाऊन आपल्या पंतप्रधानांनी नवे काय सांगितले? असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे

राष्ट्रनिर्माणात सैन्याइतकेच ‘बळी’चे म्हणजे शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे. ‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बळीराजाचा बळी देऊन राज्य चालवले जात आहे. निसर्ग झोडत आहे व राजा मारत आहे. अशा कोंडीत सापडलेला बळीराजा चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत येणारा दिवस ढकलत आहे. जोपर्यंत बळीराजास सुखाचे दिवस येत नाहीत, तोपर्यंत दिवाळी आणि पाडवा खऱ्या अर्थाने तेजोमय होणार नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री ‘पाडव्या’स शुभेच्छा देतात व आपापल्या बंगल्यांच्या आवारात थाटात सण साजरे करतात. बळीराजा मात्र बांधावर विमनस्कपणे बसून नुकसान झालेल्या पिकाकडे पाहत असतो. सीमेवरील सैनिकाला राष्ट्रनिर्माणाचे योगदान म्हणून ‘पगार’, ‘पेन्शन’ मिळते. बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबास पेन्शन मिळते, पण बळीराजा व त्याचे कुटुंब सदैव निराधार म्हणून जगते. बळीराजा व त्यांची पोरे शेवटी कंटाळून आत्महत्या करतात व त्यांच्या कुटुंबास नंतर जे भोग भोगावे लागतात ते भयंकर असतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ही वेदना कुणीतरी मांडायला हवीच म्हणून ती मांडली, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान