शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Maharashtra Politics: “भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:29 IST

Maharashtra News: मुंबईचा विकास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेला आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर आता ही सुनावणी थेट फेब्रुवारी महिन्यात पुढे ढकलली आहे. मात्र, यातच ठाकरे गटातील आमदाराने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती आहे, या शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला. 

ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही त्यांनी पक्ष फोडले. कर्नाटकातही पक्ष फोडले. स्वतःचा पक्ष वाढत नाही. तर, फोडा आणि राज्य करा. ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिली आहे. सुरुवातीला भाजपने असे दाखवले की, आम्ही त्यातले नाहीत. पण, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी याला फोन केला होता. वहिनीसाहेबांनीही सांगितले होते की, देवेंद्र फडणवीस हे रात्री वेषांतर करून जात होते. त्यामुळे पक्ष फोडण्यात भाजपचा सहभाग होता, हे स्पष्ट आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. 

मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात

मुंबईचा विकास शिवसेनेने साधला आहे. आधी मुंबई पाण्यात बुडत होती. आता ठाणे, नागपूर, पुण्याचीही तशीच परिस्थिती झाली. परंतु, मुंबई सुरक्षित राहिली. याचे कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेत झालेले काम आहे. मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत झालेले आहे. याला कुणी थांबवू शकत नाहीत. नवीन सरकार आले. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पद्धतीने खर्च करणे सुरू आहे, अशी टीका दानवे यांनी केली. 

दरम्यान, अधिकाऱ्यांवर अन्याय करणे सुरू आहे. याचा धडा मुंबईकर जनता या गद्दारांना शिकवतील, असा दावा दानवे यांनी केला. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचे आठवते का? ते कधी प्रभावी नेते होते का? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा