शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:29 IST

Maharashtra News: मुंबईचा विकास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेला आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर आता ही सुनावणी थेट फेब्रुवारी महिन्यात पुढे ढकलली आहे. मात्र, यातच ठाकरे गटातील आमदाराने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती आहे, या शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला. 

ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही त्यांनी पक्ष फोडले. कर्नाटकातही पक्ष फोडले. स्वतःचा पक्ष वाढत नाही. तर, फोडा आणि राज्य करा. ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिली आहे. सुरुवातीला भाजपने असे दाखवले की, आम्ही त्यातले नाहीत. पण, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी याला फोन केला होता. वहिनीसाहेबांनीही सांगितले होते की, देवेंद्र फडणवीस हे रात्री वेषांतर करून जात होते. त्यामुळे पक्ष फोडण्यात भाजपचा सहभाग होता, हे स्पष्ट आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. 

मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात

मुंबईचा विकास शिवसेनेने साधला आहे. आधी मुंबई पाण्यात बुडत होती. आता ठाणे, नागपूर, पुण्याचीही तशीच परिस्थिती झाली. परंतु, मुंबई सुरक्षित राहिली. याचे कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेत झालेले काम आहे. मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत झालेले आहे. याला कुणी थांबवू शकत नाहीत. नवीन सरकार आले. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पद्धतीने खर्च करणे सुरू आहे, अशी टीका दानवे यांनी केली. 

दरम्यान, अधिकाऱ्यांवर अन्याय करणे सुरू आहे. याचा धडा मुंबईकर जनता या गद्दारांना शिकवतील, असा दावा दानवे यांनी केला. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचे आठवते का? ते कधी प्रभावी नेते होते का? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा