शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय, फोडा आणि राज्य करा हीच नीती”; ठाकरे गटाची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:29 IST

Maharashtra News: मुंबईचा विकास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेला आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर आता ही सुनावणी थेट फेब्रुवारी महिन्यात पुढे ढकलली आहे. मात्र, यातच ठाकरे गटातील आमदाराने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती आहे, या शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला. 

ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही त्यांनी पक्ष फोडले. कर्नाटकातही पक्ष फोडले. स्वतःचा पक्ष वाढत नाही. तर, फोडा आणि राज्य करा. ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिली आहे. सुरुवातीला भाजपने असे दाखवले की, आम्ही त्यातले नाहीत. पण, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी याला फोन केला होता. वहिनीसाहेबांनीही सांगितले होते की, देवेंद्र फडणवीस हे रात्री वेषांतर करून जात होते. त्यामुळे पक्ष फोडण्यात भाजपचा सहभाग होता, हे स्पष्ट आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. 

मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात

मुंबईचा विकास शिवसेनेने साधला आहे. आधी मुंबई पाण्यात बुडत होती. आता ठाणे, नागपूर, पुण्याचीही तशीच परिस्थिती झाली. परंतु, मुंबई सुरक्षित राहिली. याचे कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेत झालेले काम आहे. मुंबईचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत झालेले आहे. याला कुणी थांबवू शकत नाहीत. नवीन सरकार आले. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पद्धतीने खर्च करणे सुरू आहे, अशी टीका दानवे यांनी केली. 

दरम्यान, अधिकाऱ्यांवर अन्याय करणे सुरू आहे. याचा धडा मुंबईकर जनता या गद्दारांना शिकवतील, असा दावा दानवे यांनी केला. दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबईत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत होते का? त्यांना कधी कुणी मुंबईतील एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलावल्याचे आठवते का? ते कधी प्रभावी नेते होते का? अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. शिवसैनिक आमच्यासोबतच आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा