शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Maharashtra Politics: “सरकार पडणारच... मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:21 IST

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. तुमचे सरकार परत आले पाहिजे, असे अनेक जण येऊ सांगतात, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. तर शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. यातच हे घटनाबाह्य सरकार पडणारच आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या एका जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तुम्ही लिहून घ्या. हे सरकार तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तारच होणार नाही. फक्त गाजर देऊन ठेवली आहेत. सगळ्या आमदारांना की तुला मंत्री बनवतो वगैरे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाही. या मंत्रिमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाही. हे सरकार चालणार कसे? हे सरकार नक्की कुणाचे आहे. दिल्लीश्वरांचे आहे की महाराष्ट्राचे हा प्रश्न पडला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या

जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वत:साठी रोजगार शोधत आहेत. स्वत:साठी दिल्लीत जातात. स्वत:साठी सूरतेला जातात. स्वत:साठी गुवाहाटीला जातात. झाडे, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काही मागितलेले तुम्ही ऐकलेय का? कधी तुम्ही ऐकलेय का की, लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी मगितले आहे. कारण असे घडलेच नाही. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी जातात, लोकांसाठी जात नाहीत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान,येताना मी एका पेट्रोल पंपावर थांबलो तेव्हा अनेक लोक मला गाडीवर टक टक करून सांगायचे की आदित्यजी तुमचे सरकार परत आले पाहिजे. कारण उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही. अनेक लोकांचे असे असते की माझ्या जिल्ह्यात काम झाले पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि माझा असा कोणता जिल्हाच नसल्यामुळे आणि आख्खा महाराष्ट्रच आमचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगती व्हावी, शाश्वत विकास व्हावा, चांगले उद्योग यावेत यासाठी आम्ही काम करत होतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे