शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

Maharashtra Politics: “सरकार पडणारच... मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:21 IST

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. तुमचे सरकार परत आले पाहिजे, असे अनेक जण येऊ सांगतात, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. तर शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. यातच हे घटनाबाह्य सरकार पडणारच आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या एका जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तुम्ही लिहून घ्या. हे सरकार तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तारच होणार नाही. फक्त गाजर देऊन ठेवली आहेत. सगळ्या आमदारांना की तुला मंत्री बनवतो वगैरे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाही. या मंत्रिमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाही. हे सरकार चालणार कसे? हे सरकार नक्की कुणाचे आहे. दिल्लीश्वरांचे आहे की महाराष्ट्राचे हा प्रश्न पडला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या

जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वत:साठी रोजगार शोधत आहेत. स्वत:साठी दिल्लीत जातात. स्वत:साठी सूरतेला जातात. स्वत:साठी गुवाहाटीला जातात. झाडे, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काही मागितलेले तुम्ही ऐकलेय का? कधी तुम्ही ऐकलेय का की, लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी मगितले आहे. कारण असे घडलेच नाही. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी जातात, लोकांसाठी जात नाहीत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान,येताना मी एका पेट्रोल पंपावर थांबलो तेव्हा अनेक लोक मला गाडीवर टक टक करून सांगायचे की आदित्यजी तुमचे सरकार परत आले पाहिजे. कारण उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही. अनेक लोकांचे असे असते की माझ्या जिल्ह्यात काम झाले पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि माझा असा कोणता जिल्हाच नसल्यामुळे आणि आख्खा महाराष्ट्रच आमचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगती व्हावी, शाश्वत विकास व्हावा, चांगले उद्योग यावेत यासाठी आम्ही काम करत होतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे