शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Karnataka Border Dispute: “आपले प्रकल्प गुजरातला नेले तसं कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 22:27 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: गुजरात निवडणुकीसाठी आमचे प्रकल्प तिकडे नेले. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी कदाचित इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक घेतली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी दोन्ही राज्यांनी आपापल्या भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू झालेला सीमावाद मिटवण्यासाठी आणि घटनात्मक मार्ग शोधण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही राज्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत. बैठकीत काही निर्णय झाले आहेत, त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणतेच राज्य दुसऱ्या राज्यावर दावा सांगणार नाही. याशिवाय, दोन्ही राज्यांकडून तीन-तीन बैठक घेऊन योग्य मार्ग काढतील, असे अमित शाह यांनी सांगितले. तत्पूर्वी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली.

कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात

जो काही वादविवाद आहे तो आपल्याच देशातील दोन राज्यांमध्ये आहे. असे वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत. काही निकाली निघाले आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून जो आक्रमकपण दिसत आहे, तो कदाचित निवडणुकीसाठी असू शकतो. जसे गुजरात निवडणुकीसाठी आमच्या इथले काही प्रकल्प तिकडे नेले. त्याचप्रकारे कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात. दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान, अमित शाहांच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात ज्या घटना सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, मराठी भाषेचा सन्मान व्हावा. तसेच मराठी माणसांवर कुठलाही अन्य होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची म्हणजेच आमची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशा प्रकारची सूचना केंद्रिय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेborder disputeसीमा वाद