शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 16:14 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेने कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत असून, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सणसणती प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, 'ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार' आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले. 

लावारिस पेड ट्रोलर्सना कामाला लावायला दम लागतो नवनीत मॅडम

उद्धवजी त्यांच्या घरात महाराष्ट्रात होते. त्यांचं टुरिंग टॉकीज नाही - सुरत, गुवाहाटी, गोवा आणि दिल्लीत जाऊन चौकिदारी करायला. उलट महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, गुजरात - आसाम - गोवा अशा तीन तीन राज्यांची गृह मंत्रालय, एका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, १०५ आमदार, ४० बंडखोर, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारिस पेड ट्रोलर्स यांना कामाला लावायला फार दम लागतो नवनीत मॅडम, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, मनसेनेही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळnavneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे