शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 16:14 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेने कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत असून, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सणसणती प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, 'ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार' आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले. 

लावारिस पेड ट्रोलर्सना कामाला लावायला दम लागतो नवनीत मॅडम

उद्धवजी त्यांच्या घरात महाराष्ट्रात होते. त्यांचं टुरिंग टॉकीज नाही - सुरत, गुवाहाटी, गोवा आणि दिल्लीत जाऊन चौकिदारी करायला. उलट महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, गुजरात - आसाम - गोवा अशा तीन तीन राज्यांची गृह मंत्रालय, एका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, १०५ आमदार, ४० बंडखोर, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारिस पेड ट्रोलर्स यांना कामाला लावायला फार दम लागतो नवनीत मॅडम, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, मनसेनेही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळnavneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे