शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:29 IST

खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - मागील अनेक वर्षांपासून जालनेकर भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यातील मतभेद अनुभवत होते. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून खोतकर आणि दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली आहे. त्यामुळे जालन्यातून शिवसेनेला बळ मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर जालना मतदार संघातून दानवेंचा सहज विजय झाला. त्याची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात ताकद लावताना दिसत आहेत.  

2014 मध्ये खोतकर यांचा निसटता विजय झाला होता. त्यांच्या विजयाचा फरक 300 मतांहूनही कमी होता. यावेली मात्र खोतकर यांनी पूर्ण जोर लावला आहे. ऐनवेळी कोणतीही कसर राहायला नको, म्हणून दानवे देखील त्यांच्यासोबत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेत बंडखोरीचा बोलबाला असताना जालन्यात खोतकरांसाठी तरी याचे टेन्शन नाही.

खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे. अर्थात याचा लाभ खोतकरांना होईल, असंही अनेकाचे म्हणणे आहे. खोतकर यांच्या समोर जालन्यातून काँग्रेसचे उमेदवार कैलाश गोरंट्याल यांचे आव्हान आहे.