शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

"मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:46 IST

Shiv Sena Shinde Group Uddhav Thackeray : आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात, पण हिंदुत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असेही राजू वाघमारे यांनी सांगितले

मुंबई - निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. तसेच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री भेटीत पालघर येथील साधु हत्याकांडाबाबत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा डॉ. वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली.  

शंकराचार्य म्हणाले "खरा हिंदू विश्वासघात करीत नाही" तेच वाक्य पकडून डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असेपर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उबाठाने आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बळकावली हा विश्वासघात नव्हता का?  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्याच्या म्हणण्याप्रमाणे  हिंदू कसे असू शकतात? असा सवाल डॉ. राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. 

लोकसभा निवडणुकीत हिरवे झेंडे फडकवत विशिष्ट समाजाच्या लोकांना सोबत घेऊन देखील उबाठाला स्वत:चा स्ट्राईक रेट राखता आला नव्हता. निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नकली शिवसेनेला असली शिवसेना करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न "उबाठा" ने शंकराचार्यांच्या मदतीने केला अशी टीका राजू वाघमारे यांनी केली. 

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करत आहेत. आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात, पण हिंदुत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे राजू वाघमारे यांनी सांगितले. 

हिंदूत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार हे सांगत राज्यातील कॉँग्रेस नेते नाचत होते. मात्र वारीसाठी, वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊली साठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा आणि तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे अशी टीका ड़ॉ. वाघमारे यांनी केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र