शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:27 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: राज्यासह संपूर्ण देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गावडे आंबेरे येथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी मोठा दावा केला. 

उदय सामंत म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्याबाबत संजय राऊत यांच्या आरोपांना काही अर्थ नाही. सर्व सामान्य मुस्लिम बांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. ज्या लोकांना वाटत आहे की, आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते या विधेयकानंतर महायुकीकडे जाणार आहेत, या भीती पोटी मुस्लिम समाजात गैरसमज परसवण्याचे षड्‍यंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखले आहे. तसेच मुस्लिम लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर सर्व सामान्यांसाठी हे विधेयक आणले आहे, अशी टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील

एकनाश शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहेत, त्यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून धोका होता त्यावेळी त्यांची सुरक्षा काढली होती. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सुद्धा काढली होती, त्यांच्या विरोधात षड्‍यंत्र रचले जात होते. गिरीश महाजन यांना मकोकाखाली अटक करण्यात येणार होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गोष्ट खरी आहे, अशी पुष्टी उदय सामंत यांनी जोडली. तसेच उद्धव ठाकरे गटांनी १०० उमेदवार उभे केले होते त्यातील ५० लोक निवडून आणायला पाहिजे होते. १०० जागा घेऊन तुम्ही २० निवडून आणले त्यामुळे तुमचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाश शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सांगत नाही ती प्रक्रिया येत्या महिन्याभरात संपेल, असा दावा उदय सामंत यांनी केला. 

दरम्यान, श्रीरामाचा आर्शिवाद घेण्यासाठी राम मंदिरात आलो. येत्या एक महिन्यात रत्नागिरीचे बस स्थानकाचे लोर्कापण होणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे