शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:27 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: राज्यासह संपूर्ण देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गावडे आंबेरे येथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी मोठा दावा केला. 

उदय सामंत म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्याबाबत संजय राऊत यांच्या आरोपांना काही अर्थ नाही. सर्व सामान्य मुस्लिम बांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. ज्या लोकांना वाटत आहे की, आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते या विधेयकानंतर महायुकीकडे जाणार आहेत, या भीती पोटी मुस्लिम समाजात गैरसमज परसवण्याचे षड्‍यंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखले आहे. तसेच मुस्लिम लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर सर्व सामान्यांसाठी हे विधेयक आणले आहे, अशी टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील

एकनाश शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहेत, त्यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून धोका होता त्यावेळी त्यांची सुरक्षा काढली होती. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सुद्धा काढली होती, त्यांच्या विरोधात षड्‍यंत्र रचले जात होते. गिरीश महाजन यांना मकोकाखाली अटक करण्यात येणार होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गोष्ट खरी आहे, अशी पुष्टी उदय सामंत यांनी जोडली. तसेच उद्धव ठाकरे गटांनी १०० उमेदवार उभे केले होते त्यातील ५० लोक निवडून आणायला पाहिजे होते. १०० जागा घेऊन तुम्ही २० निवडून आणले त्यामुळे तुमचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाश शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सांगत नाही ती प्रक्रिया येत्या महिन्याभरात संपेल, असा दावा उदय सामंत यांनी केला. 

दरम्यान, श्रीरामाचा आर्शिवाद घेण्यासाठी राम मंदिरात आलो. येत्या एक महिन्यात रत्नागिरीचे बस स्थानकाचे लोर्कापण होणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे