शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

“ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:27 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरेंनी १०० उमेदवार उभे केले. पण त्यांचे २० जण निवडून आले. त्यामुळे त्यांचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: राज्यासह संपूर्ण देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गावडे आंबेरे येथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी मोठा दावा केला. 

उदय सामंत म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्याबाबत संजय राऊत यांच्या आरोपांना काही अर्थ नाही. सर्व सामान्य मुस्लिम बांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. ज्या लोकांना वाटत आहे की, आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते या विधेयकानंतर महायुकीकडे जाणार आहेत, या भीती पोटी मुस्लिम समाजात गैरसमज परसवण्याचे षड्‍यंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखले आहे. तसेच मुस्लिम लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर सर्व सामान्यांसाठी हे विधेयक आणले आहे, अशी टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील

एकनाश शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहेत, त्यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून धोका होता त्यावेळी त्यांची सुरक्षा काढली होती. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सुद्धा काढली होती, त्यांच्या विरोधात षड्‍यंत्र रचले जात होते. गिरीश महाजन यांना मकोकाखाली अटक करण्यात येणार होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गोष्ट खरी आहे, अशी पुष्टी उदय सामंत यांनी जोडली. तसेच उद्धव ठाकरे गटांनी १०० उमेदवार उभे केले होते त्यातील ५० लोक निवडून आणायला पाहिजे होते. १०० जागा घेऊन तुम्ही २० निवडून आणले त्यामुळे तुमचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाश शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सांगत नाही ती प्रक्रिया येत्या महिन्याभरात संपेल, असा दावा उदय सामंत यांनी केला. 

दरम्यान, श्रीरामाचा आर्शिवाद घेण्यासाठी राम मंदिरात आलो. येत्या एक महिन्यात रत्नागिरीचे बस स्थानकाचे लोर्कापण होणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे