शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“सभेत ५०० जण नाही, स्वतःला युवराज समजाच, पण...”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:29 IST

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाण्यातील एका सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना खुले आव्हान देताना टीका केली. यावर आता शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हिंमत असेल तर राजीनामा द्या, तुमच्याविरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो, असे खुले आव्हान देत, अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही. पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात. असे हे राज्यातील गरिब शेतकरी असल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी पलटवार केला आहे. 

येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन बघावे की, किती आधुनिक शेती केली आहे. आदित्य ठाकरे यांनी कधी शेती केली नाही वा शेतात काम केले नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे नव्हे तर महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. आदित्य ठाकरे आरोप करतात आमवस्या पौर्णिमेळा रात्री शेती करतात, आदित्य यांना सांगायचे तुम्ही शेती पाहायला जावे, सवड काढून शेती पाहावी, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला.

युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही

आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. २०१९ ला वरळीमधून ते लढले. पण दोन दिग्गच माजी आमदारांना विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली? ज्यांना निवडून यायला दोन विधान परिषदेच्या जागा द्यावा लागतात आणि नंतर विधानसभा निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच असून, मुख्यमंत्र्यांवर भाष्य करू नये, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.

 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे