शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

“उद्धव ठाकरेंना भाजपाने घेतले पाहिजे ना? या हतबलतेला संजय राऊत जबाबदार”; शिंदेसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:21 IST

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: पक्ष शेवटच्या घटका मोजत असला तरी उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये, अशी टीका शिंदेसेनेने केली आहे.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: हिंदुहृदयसम्राट दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने मेळावे घेतले आणि जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपासह शिवसेना शिंदे गटातील नेते उत्तर देत आहेत.

पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे, बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. मला ही जागा शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहे तोपर्यंत ही जागा सोडणार नाही. पण, बाळासाहेबांचे विचार सोडले असे एकही निष्ठावंत म्हणाला, तर हे पदही सोडेन. आम्ही हरूनही जनता आमचे स्वागत करते. निवडणुकीत बेकायदेशीरपणे यंत्रणा वापरल्या. महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा. अडीच वर्ष मुख्यमंत्री केले. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळाले, गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू, असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरे जातील पण भाजपाने त्यांना घ्यायला हवे ना?

उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील पण भाजपाने त्यांना घेतले पाहिजे ना? त्यांचे प्रयत्न होते आणि आताही सुरु आहेत. कोणाकोणाच्या माध्यमातून फोन गेले आहेत हे आम्हाला सर्व माहिती आहे. आता सर्व टोमणे मारून झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करून एक नवीन टोमणा काढला आहे, ‘रुसू बाई रुसू, गावी जाऊन बसू’. पण तुम्हाला काय करायचे? उद्धव ठाकरे कोणाला कोणती उपमा देत आहेत? अमित शाह यांच्याबरोबर तुमचेही नमस्कार करताना फोटो आहेत. ते शेअर केले तुमची काय अवस्था होईल? उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये. आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटची घटका मोजत आहे हे या महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल, या शब्दांत संजय शिरसाट यांनी पलटवार केला. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे त्यांनी सांगावे. सहज जाऊन भेट घेतली असे नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे हतबलता व्यक्त केली असेल. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावरील हतबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत. आजही त्यांची मानसिकता बदलत नाहीत. ते पक्ष वाचवण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यात धन्यता मानतात, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत