शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:25 IST

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: तेव्हा शिवसेना-मनसे युतीबद्दल बोलायचो. पण उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली.

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत. ज्या ध्वनिफिती नाहीत, त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिंदे गटाने प्रतिक्रिया देताना आम्ही मागेच उद्धव ठाकरेंनाराज ठाकरेंशी बोलणी करून युती करूया, असे सांगत होतो, असे म्हटले आहे. 

आजची परिस्थिती कशीही असो, राज ठाकरे गेल्या १४ वर्षांपासून त्यांचा पक्ष चालवत आहेत. त्यांच्या ताकदीने ते पक्ष चालवत आहेत. त्यांनाही बराच त्रास दिला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही, प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही. राज ठाकरे त्यांना झालेला त्रास विसरणार नाहीत, असे सांगताना, अशा अनेक कारणांमुळे ठाकरे गट आणि मनसेची युती होईल, असे वाटत नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो

आम्ही २०१४ ला मनसेसोबत युती करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, तेव्हा ते आम्हाला म्हणाले, का बोलायचे? कशासाठी बोलायचे? ज्यांना तिकडे जायचे, ते जाऊ शकतात. दोन्ही भाऊ एकत्र येणे आनंदाची गोष्ट आहे. परंतु स्वतःचे काही द्यायचं नाही, ही जी त्यांची वृत्ती आहे, त्यामुळे दोन पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. ते खूप दिलदार आहेत. ते एखाद्या वेळी असा निर्णय घेऊ शकतात. परंतु, यांच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूचे बगलबच्चे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, असे सांगत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली. 

दरम्यान, आम्ही स्वतः शिवसेना मनसे युतीबद्दल बोलायचो. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजप युती नव्हती, तेव्हा आम्ही बोललो होतो. आपली भाजपबरोबर युती होत नाही ना, मग आपण राज ठाकरे यांच्याशी बोलायला हवे. पण नाही, ते म्हणाले, का बोलायचे? कशासाठी बोलायचे? ज्यांना तिकडे जायचे आहे ते जाऊ शकतात. हे त्यांचे ठरलेले वाक्य आहे. त्यामुळे कधी जवळीक निर्माण झाली नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे