शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:03 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटाच एवढा आहे की, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, शिंदे गटात मोठे पक्षप्रवेश होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. 

अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून, ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला गेला होता. याबाबत हा दावा खोटा असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवली. या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया देत पुढे नेमके काय घडणार, याबाबत सूतोवाच केले.

९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार

पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, कोणतेही मिशन सांगून राबवले जात नाही. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा पाहता, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेनाएकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालते, हे अनेक जणांना कळून चुकले आहे, त्यामुळे अनेक जण संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित आहे. मी पुढील ९० दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार असे सांगितलं होते. एक दिवस किंवा २४ तासात होणार, असे म्हटले नव्हते. रत्नागिरीत जो कार्यक्रम करुन दाखवला, ती झलक होती. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार, यावर मी ठाम आहे. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व ठाकरेंपेक्षा भावनाशील आहे, असे अनेकांचे मत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

दरम्यान, मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही गुवाहाटीला गेलो, पुन्हा मंत्री झालो. त्यांच्या राजकीय प्रवासात त्रास होईल असे कुठले कृत्य आमच्याकडून होणार नाही. इतरांनी आमच्यात भांडणे लावण्याचे बालिश राजकारण करु नये, या शब्दांत उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे