शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:36 IST

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: मातीची धरणे असतात ती खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून सातत्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून शिंदे गटातील नेत्यांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून पलटवार केला आहे. 

‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत. मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेले नाही. तर खेकड्यांनी ते पोखरले, असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर...

ते स्वतः म्हणजे धरण नाही, धरण हे कसे असते? धरण हे अभेद्य असते. मातीची जी धरणे असतात ती धरणे खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार भरभक्कम धरणांसारखे आहेत. अशी धरणे कधीही फुटू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून ते वेगळे झाले आहेत. त्यांच्या मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले होते, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही, या शब्दांत दीपक केसरकर यांनी पलटवार केला. 

दरम्यान, विरोधकांच्या INDIA आघाडीबाबत बोलताना, अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन कधीही लढा उभा राहत नसतो. लढा हा देशाच्या हितासाठी असू शकतो. आज देशाचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदीच साधू शकतात आणि ही वस्तूस्थिती आहे, असे दीपक केसरकर यांनी नमूद केले. आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असे संजय शिरसाट म्हणाले. 

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे