शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:36 IST

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: मातीची धरणे असतात ती खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले.

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून सातत्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून शिंदे गटातील नेत्यांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून पलटवार केला आहे. 

‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत. मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेले नाही. तर खेकड्यांनी ते पोखरले, असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर...

ते स्वतः म्हणजे धरण नाही, धरण हे कसे असते? धरण हे अभेद्य असते. मातीची जी धरणे असतात ती धरणे खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार भरभक्कम धरणांसारखे आहेत. अशी धरणे कधीही फुटू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून ते वेगळे झाले आहेत. त्यांच्या मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले होते, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही, या शब्दांत दीपक केसरकर यांनी पलटवार केला. 

दरम्यान, विरोधकांच्या INDIA आघाडीबाबत बोलताना, अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन कधीही लढा उभा राहत नसतो. लढा हा देशाच्या हितासाठी असू शकतो. आज देशाचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदीच साधू शकतात आणि ही वस्तूस्थिती आहे, असे दीपक केसरकर यांनी नमूद केले. आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असे संजय शिरसाट म्हणाले. 

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे