शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:31 IST

Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group News: एका बाजूला विरोधक महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करत असून, दुसरीकडे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अद्याप संपलेला दिसत नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार असून, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहे. अमित शाह यांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. 

रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पहिल्यापासून शक्तिप्रदर्शन करत आक्रमक भूमिका घेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे हेही अदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे, म्हणून आग्रही आहेत. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे. 

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह

आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. तसेच अमित शाह हे खासदार तटकरे यांच्याकडे भोजनाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. कारण आम्ही सर्वच रायगडवासीय आशावादी आहोत की भरत गोगावले यांच्या रुपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल. आम्ही सर्वजण आशावादी आहोत की, आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. पण जर असे घडले नाही तर रायगडची परंपरा आहे की, रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होते. हे देशाने आणि राज्याने पाहिले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खरे तर खूप उशीर झाला आहे. मागच्या परिवर्तनात रायगडचा इतिहास हा सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा भरत गोगावले हे कदाचित मंत्री झाले असते तर ते पालकमंत्री नक्कीच झाले असते. कारण भरत गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो. सुनील तटकरे यांचा हव्यास असला तरी रायगडची जनता हे स्वीकारणार नाही, असेही दळवी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :RaigadरायगडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरे