शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:38 IST

Shiv Sena Shinde Group: उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला.

Shiv Sena Shinde Group: विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सर्व जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीत प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले जात आहे. यातच आता केवळ लक्ष्मी दर्शनामुळेच जयंत पाटील यांना मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाची जनतेतील क्रेझ संपली आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे. 

शेकाप पक्षाचा अंत आता जवळ आला आहे. शेकापची जनमानसात असलेली  क्रेझ आता संपलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा बळी जाणार हे आधीच सांगितले होते. त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही जनाधार नव्हता. गेल्या १५ वर्षांत जयंत पाटील यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. परंतु, शरद पवार गटाची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचे राजकारण आधी नव्हते. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचे. आधीही निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असे घडत असेल तर जनतेने दोन्ही सभागृहे कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना