शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:38 IST

Shiv Sena Shinde Group: उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला.

Shiv Sena Shinde Group: विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सर्व जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीत प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले जात आहे. यातच आता केवळ लक्ष्मी दर्शनामुळेच जयंत पाटील यांना मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाची जनतेतील क्रेझ संपली आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे. 

शेकाप पक्षाचा अंत आता जवळ आला आहे. शेकापची जनमानसात असलेली  क्रेझ आता संपलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा बळी जाणार हे आधीच सांगितले होते. त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही जनाधार नव्हता. गेल्या १५ वर्षांत जयंत पाटील यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. परंतु, शरद पवार गटाची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचे राजकारण आधी नव्हते. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचे. आधीही निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असे घडत असेल तर जनतेने दोन्ही सभागृहे कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना