शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:47 IST

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुंबई: आताच्या घडीला देशातील राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजप आपले उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार देऊन चुरस वाढवल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला आहे. यातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे, असा दावा संजय राऊत केला.

राज्यसभेसाठी १० जून रोजी तर विधान परिषदेसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला. 

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचेय

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, असा असेही ते म्हणाले. 

दरम्यान, विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा