शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:47 IST

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुंबई: आताच्या घडीला देशातील राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजप आपले उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार देऊन चुरस वाढवल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला आहे. यातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे, असा दावा संजय राऊत केला.

राज्यसभेसाठी १० जून रोजी तर विधान परिषदेसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला. 

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचेय

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, असा असेही ते म्हणाले. 

दरम्यान, विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा