शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:47 IST

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुंबई: आताच्या घडीला देशातील राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजप आपले उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार देऊन चुरस वाढवल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही भाजपने अतिरिक्त उमेदवार दिला आहे. यातच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे, असा दावा संजय राऊत केला.

राज्यसभेसाठी १० जून रोजी तर विधान परिषदेसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला. 

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचेय

भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, असा असेही ते म्हणाले. 

दरम्यान, विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह ११३ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा