शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sanjay Raut: “भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 19:56 IST

Sanjay Raut: ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लागोपाठ घेतलेल्या सभानंतर राज्यातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. भोंगे उतरले नाहीत, तर हनुमान चालिसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही केली आहे. यावरून राज ठाकरेंवर महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला असून, भाजपने सूचवल्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जात असल्याचे संजय राऊत म्हणालेत.

भारतीय जनता पक्षाने सूचवले असेल म्हणून राज ठाकरे अयोध्येला चालले आहेत. शिवसेना आधीपासून अयोध्येला जात आहे. आमच्या हिंदुत्वाची सुरुवात अयोध्येपासून झाली आहे. आम्हाला निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी आम्ही अयोध्येत जाऊन निवडणूक लढलो. आमचा झेंडा तिथे लावून आलो आहे. राज ठाकरे जातात म्हणून शिवसेना आणि आदित्य ठाकरे अयोध्येला जात नाहीत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. 

आम्ही अयोध्येला गेलो होतो तेव्हा आमच्यावर टीका केली होती

मागच्या वेळी आम्ही अयोध्येला गेलो होतो, तेव्हा याच राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती. यांना देवही उत्तर भारतातील लागतात, असे म्हटले होते. यावर मीडिया राज ठाकरे यांना प्रश्न विचारत नाहीत. आम्ही त्यांना नाही, तर राज ठाकरे शिवसेनेला फॉलो करत आहेत. ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी जास्त काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याउलट राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेली वक्तव्य सर्वश्रुत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ते टीव्ही९च्या मुलाखतीत बोलत होते. 

दरम्यान, मशिदींवरील भोंग्याबाबतचा मुद्दा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलो, तरी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही. भाजपच्या हिंदुत्वाचा प्रकार वेगळा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व अंतरात्म्यातून आले आहे. यात राजकीय फायदा तोट्याचा प्रश्न नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तो कधीही केला नाही. शिवसेनेने हिंदुत्वासाठी नेहमी त्यागच केला आहे. हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे