शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Shiv Sena:"जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 11:30 IST

Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

मुंबई - खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे.  आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग किंवा अन्य यंत्रणा काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दिल्लीच्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणली आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतोय. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा. 

तुम्हाला राज्यातील जनता राजकारणातून उठवणार आहेच. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. हे पैसे दिलेले फोडलेले लोक नाही आहेत. बंडखोर आम्ही उठाव केला, असं म्हणताहेत, पण कसला उठाव? या उठाव मधील उठा म्हणजे उद्धव ठाकरे आहे, ते तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना कुणाची पुरावे द्यावे लागणे हे दुर्दैव असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. तुम्ही फुटलेले आहात, वेगळा गट तयार केला आहात. तुम्ही तुमच्या नवीन संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे, त्यांचं हत्यार म्हणून यांना वापरलं जातंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. मराठी माणसाच्या हृदयात शिवसेनेला स्थान आहे. आज आमच्यावरती पुरावे सादर करण्याची वेळ आणताय, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेत. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसलाय, ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलीय त्यांना राज्याची जनता माफ करणार नाही, आई जगदंबा माफ करणार नाही. पुरावा काय पाहिले या राज्याची जनता हाच पुरावा आहे. सीमाप्रश्नाच हुतात्मा झालेले शिवसैनिक हाच पुरावा आहे. या राज्याच्या मातीत कणाकणात मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. १०-२० माणसं फोडली म्हणजे हा पुरावा होऊ शकत नाहीत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना