शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:16 IST

मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं. 

मुंबई - गेली १० वर्ष मनसेचा इतिहास पाहिला आणि त्यांच्या अध्यक्षांच्या बदलत्या भूमिका पाहिल्या ते अचंबित करणारे, बुचकळ्यात टाकणारे आहे. निश्चित धोरणे, पक्षाची विचारधारा काय हे फारसं निष्पन्न होत नाही. लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, विधानसभेला भाजपासोबत काही ठिकाणी मैत्री केली. भाजपाशी त्यांनी मैत्री असू दे आम्हाला काही देणेघेणे नाही परंतु आम्हाला मुंबईत ७-८ जागांवर मनसेमुळे फटका बसला. सदा सरवणकरांची सीटिंग जागा पडली. वरळीतही आमचे उमेदवार जिंकले असते. महायुती यायचंय आणि युतीतील घटकपक्षाचे नुकसान होत असेल तर आम्ही कुठल्या मनाने त्यांचं स्वागत करायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे असा निशाणा शिंदेसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर साधला आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर मनीषा कायंदे यांनी हे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा महायुतीचं सरकार झाले तेव्हा एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे चित्र पूर्णपणे वेगळे होते. आमच्या ७-८ जागांचे नुकसान झाले हे आमच्यासाठी मोठे आहे. अद्याप युतीची चर्चा नाही. भाजपाचे नेते, आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटत असतात पण युतीचा विषय वेगळा आहे त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आकडेवारी पाहिली, मतदानाची टक्केवारी पाहिली मनसेमुळे आमच्या जागा पडल्या हे दिसते. मनसेने जिथे उमेदवार उभे केले तिथे आम्ही हरलो. त्यामुळे महायुतीत कुठल्या मनाने आम्ही स्वागत करायचे असा सवाल करत आमदार मनीषा कायंदे यांनी मनसेच्या महायुतीतील समावेशाला विरोध केला आहे.

दरम्यान, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आमचे मत नक्कीच व्यक्त करू. जेव्हा महायुतीत मनसेच्या समावेशाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे विचारतील तेव्हा आम्ही आमची मते त्यांना सांगू. मनसेला आमचा विरोध आहे. ज्या जागा पडल्या तिथले कार्यकर्ते विचारतील. माहिमसारखी आमची हक्काची जागा दीड हजार मतांनी पडलीय. तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता विचारात घेणे आवश्यक आहे असंही आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे