शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 12:18 IST

बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या देशाचं आणि राज्याचं भविष्य ठरवू नये ही भूमिका आमची होती

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. महाराष्ट्रातील सरकारवर शिवसेनेच्या भूमिकेमुळे परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. या विषयाचा परिणाम महाराष्ट्राच्या सरकारवर होणार नाही. शिवसेना कधीही दबावतंत्राला घाबरलं नाही, हे सरकार धार्मिक अधिष्ठानावर नव्हे तर किमान समान कार्यक्रम यावर चाललं आहे. राष्ट्रीय प्रश्नांचा राज्यातील मुद्द्यांवर परिणाम होणार नाही. आम्ही युपीएमध्ये नाही. भाजपासोबत असतानाही आमची वेगळी मतं होती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 

झी २४ तासशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लहान पक्षांना आमिष दाखवून दडपशाहीचा वापर करुन विधेयक मंजूर करुन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला राष्ट्रवाद शिकविला जातो, हिंदुत्व शिकविलं जातं. आम्हाला हिंदुत्व, राष्ट्रवाद कोणाकडून उसणं घेण्याची गरज नाही, हिंदूत्व स्वीकारणं किंवा हिंदू असणं भाजपाची गुलामी स्वीकारणं हे होत नाही, ज्याला सेक्युलर जगायचं आहे त्यांनी कॉग्रेसची गुलामी स्वीकारणं असं होतं नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आलं त्याला पाठिंबा देणारे राष्ट्रभक्त, जे पाठिंबा देणार नाहीत ते राष्ट्रद्रोही, पाकिस्तानची भाषा बोलतात हे तुम्ही ठरविणारे कोण? नवाब शरीफांच्या वाढदिवसाला केक कापायला कोण गेलं होतं? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? तुम्ही हिंदुत्व घेऊन फिरताय ते बाळासाहेबांनी केलं आहे. त्यामुळेच तुम्ही ज्या शाळेत शिकताय त्याचे हेडमास्टर आम्ही आहोत. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेच केलं आहे असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. 

त्याचबरोबर शिवसेनेने भूमिका बदलली नाही, जे प्रश्न लोकसभेत विचारले तेच राज्यसभेत विचारले. आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाही. हिंदू शरणार्थींना आश्रय देऊ नका आम्ही कधीच म्हटलो नाही. आजूबाजूच्या देशात अल्पसंख्याक म्हणून हिंदूंवर अत्याचार होतायेत हे सत्य आहे. या लोकांना नागरिकत्व देण्यास अडचण नाही, पण कितीप्रमाणात घेणार आहात? कोणत्या राज्यात या लोकांना ठेवणार आहात? ईशान्येकडील राज्यात उद्रेक सुरु आहेत ते कशासाठी सुरु आहे? श्रीलंकेत तामिळ बांधव आहेत तेसुद्धा याच यातना भोगतायेत. जे येतील त्यांना २५ वर्ष मतांचा अधिकार देऊ नका हे आम्ही सांगितले. त्यांनी आश्रय मागितला तर मताचा अधिकार नाही. बेरोजगारी, महागाई, आर्थिक व्यवस्था कोलमडली यावरुन लक्ष हटविण्यासाठी हे सुरु आहे. ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केलं जातयं अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली. 

दरम्यान, बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या देशाचं आणि राज्याचं भविष्य ठरवू नये ही भूमिका आमची होती. मी बोलत असताना माईकचा आवाज बंद केला. ही दडपशाही आहे, संसदीय लोकशाही आणीबाणी आणण्याचा प्रयत्न कराल तसं होणार नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्याने विधेयक पास होणार होतं असं सांगत राऊतांनी भाजपावर पुन्हा आरोप केला.    

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकlok sabhaलोकसभा