शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवसेना, राष्ट्रवादी या लहान भावांना सांभाळा! कामाला लागा, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:35 IST

प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सर्वोच्च शिखरावर नेण्याचे काम केले आहे. ९ वर्षांत भारत बदलला आहे. विरोधकांचे काम हे मोदींना विरोध करणे आहे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाहीय. त्यांचे दुकान बंद होईल म्हणून ते एकत्र आले आहेत. यामुळे मोदीना पंतप्रधान बनवणे हे भाजपासाठीच नाहीतर भारतासाठी महत्वाचे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. आपली जबाबदारी समजून कामे केली पाहिजेत. तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायचे असते, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. 

नरेंद्र मोदींनी कुठेही भाषण केले तर जनता त्यांना ऐकायला येते, पण अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आंध्र प्रदेशात भाषण केले तर त्यांना ऐकायला कोण येणार? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच भारताने आपल्या प्रगतीचा वेग मंदावू दिला नाही, किंबहूना तो वाढवला. भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे फडणवीस म्हणाले. 

लोक ज्यावेळी मोदींचा विचार करतात त्यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हेच विचार असतात. इंडिया आघाडीत आपआपसात वाद, ही स्थिती अशी आहे की ते एकत्र राहू शकणार नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा