शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:08 IST

शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. जेणेकरून कर्जमाफी मिळू शकते, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला आहे. 2014 प्रमाणेच यावेळीही महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. याउलट भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपचं संख्याबळ 123 वरून 105 वर आले आहे. तर शिवसेनेची 63 वरून 56 वर घसरण झाली आहे. त्यामुळे सरकार कोण स्थापन करणार यावर खलबते सुरू झाली असून अनेकांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं अस वाटत आहे. अशी भावना असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

विधानसभेला भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यातच विरोधी पक्षांनी शिवसेनेला ऑफर दिल्याने शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं अस वाटत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं असं वाटण्यामागे मोठ कारण आहे. विरोधात बसललेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात सरसकट शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. तर भाजपने दिलेल्या अर्धवट कर्जमाफीवर नाराज असलेल्या शिवसेनेने देखील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळू शकते.

दरम्यान भाजपकडून मागच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. परंतु, ही कर्जमाफी बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राग आहे. तर पीकविम्या संदर्भातही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पीकविम्यावरून तर शिवसेना देखील आंदोलनाच्या भूमिकेत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार स्थापन व्हावं, असं वाटत आहे.

याउलट भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा चकार शब्द काढण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यास कर्जमाफी मिळेल याची शेतकऱ्यांना सुताराम शक्यता वाटत नाही. एकूणच शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. जेणेकरून कर्जमाफी मिळू शकते, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.