शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:08 IST

शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. जेणेकरून कर्जमाफी मिळू शकते, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला आहे. 2014 प्रमाणेच यावेळीही महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. याउलट भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपचं संख्याबळ 123 वरून 105 वर आले आहे. तर शिवसेनेची 63 वरून 56 वर घसरण झाली आहे. त्यामुळे सरकार कोण स्थापन करणार यावर खलबते सुरू झाली असून अनेकांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं अस वाटत आहे. अशी भावना असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

विधानसभेला भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यातच विरोधी पक्षांनी शिवसेनेला ऑफर दिल्याने शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं अस वाटत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार यावं असं वाटण्यामागे मोठ कारण आहे. विरोधात बसललेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात सरसकट शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. तर भाजपने दिलेल्या अर्धवट कर्जमाफीवर नाराज असलेल्या शिवसेनेने देखील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळू शकते.

दरम्यान भाजपकडून मागच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. परंतु, ही कर्जमाफी बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राग आहे. तर पीकविम्या संदर्भातही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पीकविम्यावरून तर शिवसेना देखील आंदोलनाच्या भूमिकेत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार स्थापन व्हावं, असं वाटत आहे.

याउलट भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा चकार शब्द काढण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यास कर्जमाफी मिळेल याची शेतकऱ्यांना सुताराम शक्यता वाटत नाही. एकूणच शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. जेणेकरून कर्जमाफी मिळू शकते, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.