शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:55 IST

आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई – आमची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा अशी होती. शिवसेना-भाजपा एकत्र राहू असं आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडली. आमदारांवर अन्याय होत होता. आम्ही तुमच्या दरवाजातच उभे होते. परंतु तुम्ही स्वत:ला कोंडून घेतले होते. कुणालाही भेटायचे नव्हते या भूमिकेमुळे हा उठाव करावा लागला अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, आज आम्ही शिवसेना-भाजपा एकत्र आहोत. उठाव करताना कुणाला आनंद झाला नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते. परंतु ती नैतिकता पायदळी तुडवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी आघाडी केली. तुम्ही त्यांच्यासोबत का गेले? शिवसेनाप्रमुखांचा विचार, लोकांच्या मताचा अनादर करून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठेय, तुमची अवस्था काय झालीय. एककाळ असा होता जेव्हा मातोश्रीच्या दारात प्रत्येकजण यायचे आणि आज तुम्हाला लोकांच्या दारात जावे लागते. इंडिया आघाडीच्या लोकांसाठी जेवणावळी करावी लागते असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं. त्याचसोबत अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. मराठवाड्यात ही बैठक होतेय. कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. ज्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळेल असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांना आमची चिंता कशासाठी? मंत्रिपद मिळाले, नाही मिळाले, विस्तार झाला, नाही झाला याबाबत विरोधकांना कोण सांगेल. आमची चिंता करू नका. आमच्याबाबतीत एवढी सहानुभूती दाखवण्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे बघावे. जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती. तेव्हा दुसऱ्या पक्षाला २ मंत्रिपदे जास्त घेऊन त्यांना पद दिले. हे आठवले तर तुम्हीही कुणावर तरी अन्याय केला होता याची जाणीव सुप्रिया सुळेंना होईल असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

आम्ही आमचे उत्तर दिलंय

आम्ही आमचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. न्यायव्यवस्थेवर ज्यांचा विश्वास नाही. विरोधात निकाल गेला तर हे सगळे मॅनेज केलेय असा आरोप करतात. उशीर झाला तरी निकाल योग्य लागला पाहिजे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिरसाट यांनी आमदार अपात्रेबाबतच्या प्रकरणावर दिली.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळे