शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:55 IST

आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई – आमची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा अशी होती. शिवसेना-भाजपा एकत्र राहू असं आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडली. आमदारांवर अन्याय होत होता. आम्ही तुमच्या दरवाजातच उभे होते. परंतु तुम्ही स्वत:ला कोंडून घेतले होते. कुणालाही भेटायचे नव्हते या भूमिकेमुळे हा उठाव करावा लागला अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, आज आम्ही शिवसेना-भाजपा एकत्र आहोत. उठाव करताना कुणाला आनंद झाला नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते. परंतु ती नैतिकता पायदळी तुडवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी आघाडी केली. तुम्ही त्यांच्यासोबत का गेले? शिवसेनाप्रमुखांचा विचार, लोकांच्या मताचा अनादर करून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठेय, तुमची अवस्था काय झालीय. एककाळ असा होता जेव्हा मातोश्रीच्या दारात प्रत्येकजण यायचे आणि आज तुम्हाला लोकांच्या दारात जावे लागते. इंडिया आघाडीच्या लोकांसाठी जेवणावळी करावी लागते असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं. त्याचसोबत अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. मराठवाड्यात ही बैठक होतेय. कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. ज्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळेल असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांना आमची चिंता कशासाठी? मंत्रिपद मिळाले, नाही मिळाले, विस्तार झाला, नाही झाला याबाबत विरोधकांना कोण सांगेल. आमची चिंता करू नका. आमच्याबाबतीत एवढी सहानुभूती दाखवण्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे बघावे. जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती. तेव्हा दुसऱ्या पक्षाला २ मंत्रिपदे जास्त घेऊन त्यांना पद दिले. हे आठवले तर तुम्हीही कुणावर तरी अन्याय केला होता याची जाणीव सुप्रिया सुळेंना होईल असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

आम्ही आमचे उत्तर दिलंय

आम्ही आमचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. न्यायव्यवस्थेवर ज्यांचा विश्वास नाही. विरोधात निकाल गेला तर हे सगळे मॅनेज केलेय असा आरोप करतात. उशीर झाला तरी निकाल योग्य लागला पाहिजे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिरसाट यांनी आमदार अपात्रेबाबतच्या प्रकरणावर दिली.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळे