शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:55 IST

आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई – आमची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा अशी होती. शिवसेना-भाजपा एकत्र राहू असं आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडली. आमदारांवर अन्याय होत होता. आम्ही तुमच्या दरवाजातच उभे होते. परंतु तुम्ही स्वत:ला कोंडून घेतले होते. कुणालाही भेटायचे नव्हते या भूमिकेमुळे हा उठाव करावा लागला अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, आज आम्ही शिवसेना-भाजपा एकत्र आहोत. उठाव करताना कुणाला आनंद झाला नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते. परंतु ती नैतिकता पायदळी तुडवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी आघाडी केली. तुम्ही त्यांच्यासोबत का गेले? शिवसेनाप्रमुखांचा विचार, लोकांच्या मताचा अनादर करून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठेय, तुमची अवस्था काय झालीय. एककाळ असा होता जेव्हा मातोश्रीच्या दारात प्रत्येकजण यायचे आणि आज तुम्हाला लोकांच्या दारात जावे लागते. इंडिया आघाडीच्या लोकांसाठी जेवणावळी करावी लागते असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं. त्याचसोबत अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. मराठवाड्यात ही बैठक होतेय. कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. ज्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळेल असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांना आमची चिंता कशासाठी? मंत्रिपद मिळाले, नाही मिळाले, विस्तार झाला, नाही झाला याबाबत विरोधकांना कोण सांगेल. आमची चिंता करू नका. आमच्याबाबतीत एवढी सहानुभूती दाखवण्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे बघावे. जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती. तेव्हा दुसऱ्या पक्षाला २ मंत्रिपदे जास्त घेऊन त्यांना पद दिले. हे आठवले तर तुम्हीही कुणावर तरी अन्याय केला होता याची जाणीव सुप्रिया सुळेंना होईल असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

आम्ही आमचे उत्तर दिलंय

आम्ही आमचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. न्यायव्यवस्थेवर ज्यांचा विश्वास नाही. विरोधात निकाल गेला तर हे सगळे मॅनेज केलेय असा आरोप करतात. उशीर झाला तरी निकाल योग्य लागला पाहिजे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिरसाट यांनी आमदार अपात्रेबाबतच्या प्रकरणावर दिली.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळे