शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने सोडला ‘साठी’चा हट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 04:54 IST

‘साठ जागा द्या, नाहीतर घरी जा,’ अशी ताठर भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नमते घेत, भाजपाला साठपेक्षा अधिक जागा देण्याची तयारी दर्शविल्याने

यदु जोशी /मुंबई‘साठ जागा द्या, नाहीतर घरी जा,’ अशी ताठर भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नमते घेत, भाजपाला साठपेक्षा अधिक जागा देण्याची तयारी दर्शविल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत युती होण्याची आशा अजूनही जिवंत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आज दुपारी नागपूरला रवाना झाले. ते रात्री उशिरा परत येणार असून, उद्या मुंबईतील दोन कार्यक्रम आटोपून दिवसभरासाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. तत्पूर्वी ते युतीबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सुत्रांनी सांगितले.२०१२ च्या निवडणुकीत भाजपाने युतीमध्ये ६३ जागा लढविल्या होत्या. त्याहीपेक्षा तीन कमी म्हणजे ६० जागांची आॅफर शिवसेनेने देऊ केल्याने मुंबईतील भाजप नेत्यांचा पारा चढला होता. त्यामुळे युतीची बोलणी अर्ध्यावरच थांबली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. त्यावेळी युतीसंदर्भात कोणतेही थेट भाष्य न करता ‘बोलणी सुरू आहे’ एवढेच सूचक वाक्य उच्चारून युतीची शक्यता अजुनही जिवंत असल्याचा संकेत त्यांनी दिला.सूत्रांनी सांगितले की, भाजपाला ८० ते ९० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेकडून दर्शविली जाऊ शकते. या ९० जागांतूनच भाजपाने आपले मित्र पक्ष रिपाइं, शिवसंग्राम आदींना जागा द्याव्यात, असे शिवसेनेकडून सांगितले जाऊ शकते. भाजपचे नेते १०० जागांसाठी आग्रही असले, तरी पाच-सात कमी जागा स्वीकारुन तडजोडही केली जाऊ शकते. युती होणार की नाही, हाच सध्या मुंबईत चर्चेचा विषय आहे. शिवसेनेने निवडणुकीसाठी तयार केलेल्या काही व्हिडीओ जाहिरातींमध्ये ‘शिवसेनेला एकहाती सत्ता द्या’ असे आवाहन करण्यात आले आहे. याचाच अर्थ शिवसेनेने स्वबळाची देखील तयारी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पुणे येथे पत्रकारांना सांगितले की, युतीबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. शेलार नरमले५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर लावला जाणार नाही, अशी निवडणूक घोषणा उद्धव ठाकरे यांनी करताच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी, ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी आधीच केलेली असून शिवसेना ती हायजॅक करीत असल्याची टीका तत्काळ केली होती. तथापि, आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वचननामा जाहीर केल्यानंतरही शेलार यांनी त्यावर भाष्य केले नाही. ‘युती व्हावी ही आमची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर मी बोलणार नाही. उद्या युती झाली तर जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध करू’ असे सांगून त्यांनी मवाळ भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांवरून शेलार नरमले अशी चर्चा आहे.

एकीकडे भाजपा-संघ, दुसरीकडे विकासभाजपाचे मुंबईतील नेते आणि रा.स्व.संघाच्या मुंबईतील रचनेमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले नेते हे ‘युती करू नये’ या मताचे आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध असलेले मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर युती व्हावी, या मताचे आहेत. या ओढाताणीत युतीबाबत आरपारचा निर्णय मुख्यमंत्री अद्याप घेऊ शकलेले नाहीत. भाजपा व संघात समन्वयाचे काम करणाऱ्यांनी गेले काही दिवस संघाच्या नेत्यांची मते जाणून घेतली. युती न करता भाजपाने दमदार अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे मत संघ धुरिणांनी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. फडणवीस यांनी उद्धव यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत युतीचे सरकार चालविले आहे. दोघांमध्ये नियमित संवादही असतो. युती झाली नाही, तर सेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही, पण दोन पक्षांमध्ये प्रचारात कटुता निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांना ही कटुता टाळायची आहे.