शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'आठवलेंसाठी महायुतीत भाजप-शिवसेना विद्यमान जागा सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:33 IST

भाजप-शिवसेना १३५-१३५ आणि मित्रपक्षाला १८ जागा देण्याचे ठरले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीप्रमाणेच विधानसभेत सुद्धा युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्यावरून अंतिम निर्णय होऊ शकला नाही. गेल्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भाजपने ८ जागा सोडल्या होत्या. मात्र त्या संपूर्ण ८ ही जागांवर शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने, महायुतीत शिवसेना-भाजपकडून विद्यामान जागा माझ्या पक्षाला सोडण्यात येईल अशी अपेक्षा करतो, असे आठवले म्हणाले आहे. 

आठवले यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखीत लोकसभावेळी ठरलेल्या महायुतीच्या फॉर्म्युल्याचा खुलासा केला आहे. भाजप-शिवसेना १३५-१३५ आणि मित्रपक्षाला १८ जागा देण्याचे ठरले होते. अशी माहिती आठवले यांनी दिली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, गेल्यावेळी माझ्या पक्षाला सोडलेल्या ८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आरपीआयला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना-भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

विशेष म्हणजे आठवले यांनी आगामी निवडणुकीत १० जागा आपल्या पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. तर या जागा देतांना गेल्यावेळी दिलेल्या जागांचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे शिवसेना आठवलेंसाठी आपल्या विद्यमान जागा सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर भाजपने सुद्धा काही विद्यमान जागा आमच्यासाठी सोडाव्यात अशी अपेक्षा असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्याच पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत. जर आमदार निवडून आले तर ते आमच्या पक्षातील असतील.अन्यथा ते आमदार भाजपचे असल्याचा संदेश जाईल. मात्र आठवले यांना महायुतीत प्रत्यक्षात किती जागा मिळणार आणि जर गेल्यावेळी दिलेल्या जागांचा त्यात समावेश असल्यास सेनेच्या विद्यामान जागा उद्धव ठाकरेंना सोडाव्या लागतील. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यासाठी तयार होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.