शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:28 IST

खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. त्यात शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तांमध्ये छापण्यात आली. या जाहिरातीनंतर भाजपा नेते नाराज झाले. त्यानंतर पुन्हा सारवासारव करत शिवसेनेकडून दुसरी जाहिरात देण्यात आली. परंतु या जाहिरातबाजीवरून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर शिवसेना नेत्यांनी पलटवार केला आहे. 

शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ५० वाघ आहेत आणि यांच्यामुळेच भाजपाच्या मंत्र्यांना सत्तेत स्थान आहे. एखाद्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची काम करण्याची पद्धत जनतेला पसंत असेल तर त्याची वाहवाह करू शकते. ते पचवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे. एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा देणे, ठाण्यापुरती मर्यादित ठेवणे हे बोलण्याआधी तुम्ही किती मर्यादित होते, कोणाच्या बळावर तुम्ही मोठे झाले. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून तुम्ही मोठे झाले, नाहीतर तुमची काय औकात होती? असा घणाघात त्यांनी केला. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल बोलताना आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करताना खासदार अनिल बोंडे यांनी आत्मचिंतन करून बोलायला पाहिजे असंही गायकवाड यांनी म्हटलं. 

तर खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते लोकप्रिय आहेत त्यांच्याबाबत शंका कुशंका करण्याची गरज नाही. आमच्या नेत्यांबद्दल जर कुणी अशाप्रकारे बोलले तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. 

काय म्हणाले होते अनिल बोंडे?एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागलं आहे, असे बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Gaikwadसंजय गायकवाडAbdul Sattarअब्दुल सत्तार