शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:30 IST

"सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये."

गेल्या तब्बल ११ महिन्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आला आहे. यात, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आता पुन्हा त्यांना मुख्यमंत्री ठेवता येणार नाही. याच बरोबर, शिंदे सरकार कायम राहणार असून, 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षच निर्णय घेतील, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, "सरकारने, शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये, अशा शब्दात शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

...हे सर्वच जर बेकायदेशीर, तर मग कायदेशीर काय? -राऊत म्हणाले, "राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत चाचणी झाली यानंतर एकमेकांना व्हिप बजावण्यात आले. हे सर्वच जर बेकायदेशीर ठरत आहे, तर मग कायदेशीर काय आहे? सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधित्व करत आहात. जर थोडी जरी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असतील, तर सरकारने ताबडतोब राजिनामा द्यायला हवा".

'त्या' 16 आमदारां संदर्भात काय म्हणाले राऊत? -"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेसल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय