शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"सूरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांना स्मृतिभ्रंश; गद्दारांनी राजीनामे देऊन दाखवावे!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:30 IST

संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

जळगाव - प्रत्येक शिवसैनिकासाठी शाखा म्हणजे मंदिर असते. यामुळे त्या मंदिरात जाण्यात काहीही गैर नाही. कारण ज्यांना पक्षाबाबतची निष्ठा असते, तेच या मंदिरात जातात व ज्यांना पैसे व ठेक्यांचे आमिष असते तेच गद्दारी करतात, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शाखा म्हणजे शिवसेनेचा आत्मा असून, याठिकाणी आम्हाला जाण्यात काहीही गैर वाटत नसल्याचेही  सावंत यांनी सांगितले. संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सुनील ठाकूर, जाकीर पठाण यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 शिवसेनेचे आमदार आमच्यासाठी गद्दार असून, त्यांनी आधी राजीनामे द्यावेत. मग दिसून जाईल की जनता कोणासोबत आहे? असे आव्हान सावंत यांनी दिले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पक्ष सोडताना आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता, तशी हिंमत गद्दार आमदारांनी दाखवावी, असे आव्हानही सावंत यांनी दिले. 

सुरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांचा स्मृतिभ्रंशगुलाबराव पाटलांनी मला शिवसेनेसाठी काय काम केले? हे विचारु नये. जळगावसह विदर्भातील तापमानाचाही आम्हाला अंदाज आहे. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपद असतानाही त्यांच्या मतदारसंघाव्यतिरिक्त पक्षासाठी काय काम केले? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. एक-दीड महिन्यापूर्वी माझी स्तुती करणाऱ्या गुलाबराव पाटलांना अवघ्या महिनाभरात नेमके काय झाले? सुरत, गुवाहाटी, गोव्याच्या दौऱ्यामुळे गुलाबराव पाटील यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे का? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.

विकासासाठी अडथळा आणल्यास जळगावकर मातीत गाडतील - जळगाव शहराच्या विकासासाठी १२० कोटींचा निधी दिला असल्याचे सांगत गुलाबराव पाटील एकप्रकारे मनपातील पदाधिकाऱ्यांना धमकीच देत आहेत. मात्र, जळगाव शहरातील विकासकामांमध्ये अडथळा निर्माण केल्यास जळगावकर त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त शब्दात सावंत यांनी उत्तर दिले आहे. ज्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच पक्ष सोडला होता, त्यांनीच पुन्हा प्रवेश केला. त्यामुळे ६० जणांचा हा प्रवेश म्हणजे भूकंप नसून, तो फुसका बारच अधिक असल्याचे सावंत म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हे गुलाबरावांचा चेहरा पाहूनच समजून जाते, असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील