शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut :“…यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” संभाजीनगर नामांतरणावरून राऊतांचा मनसेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:16 IST

Sanjay Raut : आमदारांना का ठेवलं वेगळं, राऊतांनी सांगितलं कारण...

१० जून रोजी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच कोणताही दगाफटका बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना अन्यत्र हलवलं आहे. शिवसेनेनंही आपल्या आमदारांना एका हॉटेलवर ठेवलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ही एक व्यवस्था म्हणून असं केलं आहे. मतदानाच्या वेळी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्या खोऱ्यांचा आहे, आमदार लांब राहतात. त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, आमदारांना मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून त्यांना एकत्र ठेवलं आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

“अशाप्रकारे भाजपनं, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलंय. त्याबद्दल थोबाडावर प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं काय आहे,” असा सवालही त्यांनी केला. तुम्ही केलं तर चालतं, तुमचं गेट टुगेटर आणि आम्ही बाजूला घेऊन गेलो, हे सर्व मुर्ख लोक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. १० तारखेला संध्याकाळी ८ वाजता निकाल स्पष्ट झाले असतील असंही ते म्हणाले. 

मनसेला टोलामनसेनं त्यासंदर्भात त्यांचे भाजपमधील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा. केंद्रात त्यांचं सरकार आहे. राज्याकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे,” असं म्हणत मनसेला टोला लगावला. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी मनसेवर निशाणा साधला.

भाजपवर निशाणा“प्रथमच एखाद्या मोठ्या देशाला लहान देशाकडून माफी मागण्याचा आग्रह होतोय. यापूर्वी अशी हिंमत कोणी केली नव्हती. भाजपकडून अशा प्रकारचे विषारी विचार या देशात पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या लोकांवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आहे. ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करतायत. तो प्रकार भाजपच्या अंगलट आला असला तरी देशाची आज बदनामी झाली आहे,” असं नुपूर शर्मा यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे