शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Sanjay Raut :“…यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” संभाजीनगर नामांतरणावरून राऊतांचा मनसेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:16 IST

Sanjay Raut : आमदारांना का ठेवलं वेगळं, राऊतांनी सांगितलं कारण...

१० जून रोजी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच कोणताही दगाफटका बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना अन्यत्र हलवलं आहे. शिवसेनेनंही आपल्या आमदारांना एका हॉटेलवर ठेवलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ही एक व्यवस्था म्हणून असं केलं आहे. मतदानाच्या वेळी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्या खोऱ्यांचा आहे, आमदार लांब राहतात. त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, आमदारांना मार्गदर्शन करायचं असतं, म्हणून त्यांना एकत्र ठेवलं आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

“अशाप्रकारे भाजपनं, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलंय. त्याबद्दल थोबाडावर प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं काय आहे,” असा सवालही त्यांनी केला. तुम्ही केलं तर चालतं, तुमचं गेट टुगेटर आणि आम्ही बाजूला घेऊन गेलो, हे सर्व मुर्ख लोक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. १० तारखेला संध्याकाळी ८ वाजता निकाल स्पष्ट झाले असतील असंही ते म्हणाले. 

मनसेला टोलामनसेनं त्यासंदर्भात त्यांचे भाजपमधील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा. केंद्रात त्यांचं सरकार आहे. राज्याकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे,” असं म्हणत मनसेला टोला लगावला. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी मनसेवर निशाणा साधला.

भाजपवर निशाणा“प्रथमच एखाद्या मोठ्या देशाला लहान देशाकडून माफी मागण्याचा आग्रह होतोय. यापूर्वी अशी हिंमत कोणी केली नव्हती. भाजपकडून अशा प्रकारचे विषारी विचार या देशात पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या लोकांवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आहे. ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करतायत. तो प्रकार भाजपच्या अंगलट आला असला तरी देशाची आज बदनामी झाली आहे,” असं नुपूर शर्मा यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे