शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:27 IST

लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत - राऊत

शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी व्यवस्था केली आहे, त्यानुसार हे चालतं. त्यांना महाराष्ट्र तोडायचाय म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीत जातो, त्यांचा काही भरवसा नाही. नशेची, सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात. उद्या मातोश्री आमचं आहे म्हणत कब्जाही करू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही असंही ते म्हणू शकतात. अशी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या भविष्याचा निर्णय घेणारी सुनावणी सुरू होणार आहे. त्याच अस्वस्थतेतून मुख्यमंत्र्यांच्या भेटी सुरू आहेत. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तरी रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवाच घडेल, याची खात्री शिवसेनेला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“५० आमदारांच्या घरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलाच होता आता खासदारांच्या घरावरी होतोय. पोलीस बळाचा वापर केला जात आहे, पैशाचा वापर आणि ब्लॅकमेलिंगही केलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला सामना करायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर तो त्यांचा नियमित दौरा आहे. ते भाजपचे मुख्यमत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे. मंत्रिमळ तयार करायचं आहे, नावं अंतिम करायची आहे, तर यावं लागेल. मी शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत, ते कधी मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले होते हे माहित नाही. त्या काळी सर्व चर्चा मुंबईत होत होती. ते कोणते प्रश्न घेऊन येथे आले असतील तर टीका करणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले. दोन हात करण्यासाठी समर्थ“लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरू आहेत, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते भाजपते लोक जाहीररित्या बोलत आहेत. ते तीन तुकडे करण्यासाठी शिवसेनेचे तुकडे करू इच्छित आहेत. अखंड शिवसेना फोडा, ताकद कमी करा. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार खासदार पाठित खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. केवळ आमदार आणि खासदार शिवसेनेची ताकद नाही. यातूनही शिवसेना पुन्हा उभी राहिल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या घराबाहेर पहारे लागलेत त्यांना कोणत्याही सभागृहात येणं कठिण करून असा इशाराही त्यांनी दिला. संजय जाधव यांच्याबद्दलच्या बातम्या येत असून ते त्यामुळे अस्वस्थ असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे