शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 11:57 IST

सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील

ठळक मुद्देसामनाच्या अग्रलेखातील भाषेविषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. औरंगाबादच्या नामांतरवरून महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं राऊतांचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. यानंतर यानंतर शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निशाणा साधला. जर चंद्रकांत पाटील हे सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील असं म्हणत राऊत यांनी त्यांना टोला लगावला."चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. आज ते वाचायला लागले हिच मोठी बाब आहे. जर ते सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होती. सकारात्मक दृष्टीकोनातून ते महाराष्ट्र आणि देशाकडे पाहतील. सामना वाचत राहतील तर त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांना येईल," असं राऊत म्हणाले.यावेळी राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावरही भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच त्यांचं प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही," असंही त्यांनी नमूद केलं.काय म्हणाले होते पाटील?"मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद