शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

“राज ठाकरे म्हणजे नवहिंदु औवेसी, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी...”; शिवसेना नेते संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:01 IST

हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

नाशिक – भाजपा आणि त्यांच्या नव हिंदुत्ववादी MIM यांना कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनं जागा दाखवली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोकं स्वीकारत नाही. भोंगे तुमचे असले तरी त्यामागचा आवाज कुणाचा आहे हे कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे. ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर(Raj Thackeray) घणाघाती टीका केली आहे.

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. रामनवमी, हनुमान जयंती दोन्ही सण देशात उत्साहाने साजरा होत आहे. रामनवमीला देशात कधी दंगल घडल्या नव्हत्या. मात्र ज्याठिकाणी निवडणुका आहेत त्याठिकाणी अशाप्रकारे ताणतणाव निर्माण करण्याचं काम करून फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कथाकथित भक्तांनी हनुमान चालीसा कॅमेऱ्यासमोर म्हणावी. मी अख्खी हनुमान चालीसा मी वाचून दाखवतो. आम्ही ढोंगीपणा करत नाही. यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही असं सांगत त्यांनी भाजपावर(BJP) निशाणा साधला आहे.  

तसेच हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत. सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत. भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा. त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे असाही आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत.  कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी भक्कम असल्याचं सिद्ध झालं. या देशात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण आम्ही पाहिलं नाही. राज्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना धोका नाही. अयोध्येत शरयू नदी किनाऱ्यावर नाशिक शिवसेनेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे म्हणून जात नाही. ते आमचं घर आहे. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तेथील मंदिराचे पुजारी, रहिवासी स्वागताला येतात असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे