शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

“राज ठाकरे म्हणजे नवहिंदु औवेसी, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी...”; शिवसेना नेते संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:01 IST

हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

नाशिक – भाजपा आणि त्यांच्या नव हिंदुत्ववादी MIM यांना कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनं जागा दाखवली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोकं स्वीकारत नाही. भोंगे तुमचे असले तरी त्यामागचा आवाज कुणाचा आहे हे कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे. ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर(Raj Thackeray) घणाघाती टीका केली आहे.

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. रामनवमी, हनुमान जयंती दोन्ही सण देशात उत्साहाने साजरा होत आहे. रामनवमीला देशात कधी दंगल घडल्या नव्हत्या. मात्र ज्याठिकाणी निवडणुका आहेत त्याठिकाणी अशाप्रकारे ताणतणाव निर्माण करण्याचं काम करून फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कथाकथित भक्तांनी हनुमान चालीसा कॅमेऱ्यासमोर म्हणावी. मी अख्खी हनुमान चालीसा मी वाचून दाखवतो. आम्ही ढोंगीपणा करत नाही. यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही असं सांगत त्यांनी भाजपावर(BJP) निशाणा साधला आहे.  

तसेच हनुमान आमच्या पाठिशी आहे. हे कोल्हापूर उत्तर जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत. सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत. भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा. त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे असाही आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत.  कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी भक्कम असल्याचं सिद्ध झालं. या देशात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण आम्ही पाहिलं नाही. राज्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना धोका नाही. अयोध्येत शरयू नदी किनाऱ्यावर नाशिक शिवसेनेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे म्हणून जात नाही. ते आमचं घर आहे. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तेथील मंदिराचे पुजारी, रहिवासी स्वागताला येतात असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे