शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

'सुरेश धस थंड का पडले? ...जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:09 IST

"यापुढेही धनंजय मुंडे यांना वाचवले जाईल. वाल्मिक कराडलाही वाचवले जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेंना त्यांचे सरकारमधील आका वाचवतील."

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात संतापाची लाट आहे. नुकतेच त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. यावरून संतोष देशमुख यांची कीती क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे प्राथमिकदृष्ट्या दिसते. या प्रकरणातील सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत असल्याचे आरोपही होत आहेत. हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलेच लाऊन धरले. यासंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज भाष्य केले. "सुरेश धस थंड का पडले? कुणी गळा दाबला आमच्या धसांचा? कुणी तरी गळा दाबलाय, कुणी तरी त्याच्या मानेवर बसलं आहे ना, पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले, तरी जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही." असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

यावेळी, एका प्रश्नाला उत्तर ददेताना राऊत म्हणाले, "यापुढेही धनंजय मुंडे यांना वाचवले जाईल. वाल्मिक कराडलाही वाचवले जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेंना त्यांचे सरकारमधील आका वाचवतील. हे आका-आका प्रकरण काय आहे. सुरेश धस थंड का पडले? कुणी गळा दाबला आमच्या धसांचा? कुणी तरी गळा दाबलाय, कुणी तरी त्याच्या मानेवर बसलं आहे ना, पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले, तरी जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही."  

समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिसंदर्भात प्रश्न केला असता राऊत म्हणाले, "समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारे आहेत." यावर, फडणवी तेव्हा असे म्हणाले होते की, अशी कुठली घटनाच घडली नाही. त्यांन चुकीचे ब्रिफिंग गेले असेल तर? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, "बघा यासंदर्भात फडणवीस खोटे बोलत आहेत. त्यांना चुकीचे ब्रिफिंग झालेले नाही. हे सर्व फोटे आणि व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवरांनीही बघितले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही बघितले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणले आहेत. जर देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले असती की, असे काही घडले नाही, मी बघितले नाही, तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. हे फोट जर आमच्यापर्यंत आले, हे व्हिडिओ जर आमच्यापर्यंत आले, ते आरोप पत्रात लावले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री हे कसकाय झटकू शकतात की, ते आमच्यापर्यंत आलं नाही, आम्ही पाहिलं नाही आणि असं काही घडलं नाही.   धड-धडीत पुरावे असता गृहमंत्र्यांना जर माहीत नसेल, तर ते गृहमंत्री पदावर व्यवस्थित कम करण्याची त्यांची माणसिकता नाही." 

राउत पुढे म्हणाले, "या राज्याचे मुख्यमंत्री हे रामशास्त्री नाहीत, हे आता लक्षात आले आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची गूज राखत नाहीत. आपल्या लोकांच्या बाबतीत काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. याला न्याय म्हणत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना न्याय करायचा असेल, तर त्यांनी कलंकित मंत्र्यांना मंत्रींडळातून ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि या राज्यात राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर इतर कुमी करू नये, हे सुद्धा बघायला हवे. आज पोलीस यंत्रणांचा गैर वापर होत आहे. कायद्याचा गैरवापर होत आहे आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. या बाबत त्यांच्या मनाला ही टोचणी लागायला हवी."

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSuresh Dhasसुरेश धसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस