शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sachin Vaze: सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 15:07 IST

Sachin Vaze: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची एक प्रतिक्रिया आली आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रियातेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊतमिठाचा खडा टाकलेला नाही: संजय राऊत

मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारला चांगलेच घेरले असून, या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची एक प्रतिक्रिया आली आहे. (shiv sena leader sanjay claims over sachin vaze case)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील 

संजय राऊत म्हणाले की, जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मिठाचा खडा टाकलेला नाही

काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार अजिबात नाही. आपण राजकारणात असू, तर टीका सकारात्मकपणे घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे टिकेचे घाव सोसूनच या शिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबद्दल चार शब्द लिहिले, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMansukh Hirenमनसुख हिरणPoliticsराजकारण