शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

ज्यांच्या रक्तात, मनात, हृदयात शिवसेना आहे असे लोक आपल्याला हवे : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 23:36 IST

काही आमदारांना जेवायला जायचं सांगून गाडीत बसवलं आणि कैदी बनवून सूरतला नेलं, आदित्य ठाकरेंचा आरोप

आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या सर्वावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. नगरसेवकांना मार्गदर्शन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. तेव्हा ते बोलत होते. 

“बाहेर असलेल्या आमदारांपैकी ५० टक्के आमदार आपल्यासोबत आहेत. काही आमदार आपल्यासोबत आजही उभे आहेत. काही जणांना जेवायला जाऊया असं सांगून गाडीत बसवलं आणि कैदी बनवून पुढे नेलं. जे काही आमदार कैदी म्हणून बसलेत त्यांना आपल्यासोबत पुढे कसं न्यायचं ते पाहू. काही आमदार तिथून फोन करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत आहेत. इथे आल्याआल्या आम्ही तुमच्यासोबत राहू असं ते सांगत आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मनाने तिथे आणि शरिरानं इथे अशी लोक नकोत. शिवसेना मानणारी लोकं, ज्यांच्या रक्तात, मनात हृदयात शिवसेना आहे अशी लोक आपल्याला पाहिजेत. ते समाजाचं, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करू शकतात. प्राईज टॅग लावलेली लोकं आपल्याला नको. आपल्याला प्राईजलेस लोक असतात, विकत देणार नाही अशी लोक आपल्याला हवं. काही जणांना आता भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना