शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

...यामागे 'मी पुन्हा येईन' म्हणतात ते आहेत का?; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:10 IST

नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य.

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

ज्या ठिकाणी मी जातोय तिथे प्रत्येक शिवसैनिक त्या परिस्थितीकडे संकट म्हणून पाहित नाही, तर संधी म्हणून पाहतोय. घाण निघून गेली आता चांगलं काही घडवू शकू. पावसाळ्यापूर्वी मुंबईतली महापालिकेची सवय आहे. रस्त्यांवरील कचरा बाजूला काढतो. नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. काल परवा व्हिडीओ पाहिला जे जे आमदार इकडून गेलेत त्यांना हाताला मानेला पकडून नेलंय याचं वाईट वाटतंय. तिकडे नेऊन असे हाल होतात. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे का? कोणता दुसरा पक्ष आहे का? किंवा जे पुन्हा येईन पुन्हा येईन बोलतात ते आहेत का? कोणी याच्या मागे असलं तर तरी महाराष्ट्र माफ करणार नाही किंवा झुकणार नाही, असं ही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंड आणि त्याचं कुरबूर आम्हाला आधीपासून लागली होती. काय नक्की चाललंय हा विचार करण्यासारखं आहे. २० जूनला काही आमदार पळवले आणि काही फसले. गुवाहाटी आणि सूरतला गेल्यावर कैद्यांसारखी परिस्थिती झाली आहे. ठाण्यापासून सुरूवात करायची झाली, आपण मोठे नेते आहोत दादागिरी करत आहोत, दादागिरीनं मनं किंवा लोकांना जिंकू शकत नाही. आज हिंदुत्व, शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनदं दिघेंबद्दल बोलताय हिच निष्ठा, हिंमत, हेच शिवसेनेचं रक्त असतं, कुठे कुठून नेलं आहे तर पहिलं गोष्ट तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय याचा आनंद झाला असता, असंही ते म्हणाले.

अनेकांनी मातोश्रीवर येण्यास सुरूवात केली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगतात. आज ते आम्ही लढायला तयार आहोत हे सांगत आहेत. हिंमत असती तर त्यांनी बंड केलं नसतं. २० तारखेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं कुरबूर कसली करताय ही घ्या वर्षाची चावी, आजपासून तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. पण रडगाणं केलं. पण बंड करायला दुसऱ्या राज्यात गेला. ठाण्यात, मुंबईत महाराष्ट्रात केला असता. निवडणुकीला सामोरे जाण्याची, राजीनामा देण्याची नैतिकचाही निघून गेली. दोन शूरवीर लढा देऊन सूरतेवरून आल्यावर ते बाकीचे कुठे गेले गुवाहाटीला, असंही त्यांनी नमूद केलं.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे