शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

...यामागे 'मी पुन्हा येईन' म्हणतात ते आहेत का?; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:10 IST

नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य.

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

ज्या ठिकाणी मी जातोय तिथे प्रत्येक शिवसैनिक त्या परिस्थितीकडे संकट म्हणून पाहित नाही, तर संधी म्हणून पाहतोय. घाण निघून गेली आता चांगलं काही घडवू शकू. पावसाळ्यापूर्वी मुंबईतली महापालिकेची सवय आहे. रस्त्यांवरील कचरा बाजूला काढतो. नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. काल परवा व्हिडीओ पाहिला जे जे आमदार इकडून गेलेत त्यांना हाताला मानेला पकडून नेलंय याचं वाईट वाटतंय. तिकडे नेऊन असे हाल होतात. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे का? कोणता दुसरा पक्ष आहे का? किंवा जे पुन्हा येईन पुन्हा येईन बोलतात ते आहेत का? कोणी याच्या मागे असलं तर तरी महाराष्ट्र माफ करणार नाही किंवा झुकणार नाही, असं ही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंड आणि त्याचं कुरबूर आम्हाला आधीपासून लागली होती. काय नक्की चाललंय हा विचार करण्यासारखं आहे. २० जूनला काही आमदार पळवले आणि काही फसले. गुवाहाटी आणि सूरतला गेल्यावर कैद्यांसारखी परिस्थिती झाली आहे. ठाण्यापासून सुरूवात करायची झाली, आपण मोठे नेते आहोत दादागिरी करत आहोत, दादागिरीनं मनं किंवा लोकांना जिंकू शकत नाही. आज हिंदुत्व, शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनदं दिघेंबद्दल बोलताय हिच निष्ठा, हिंमत, हेच शिवसेनेचं रक्त असतं, कुठे कुठून नेलं आहे तर पहिलं गोष्ट तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय याचा आनंद झाला असता, असंही ते म्हणाले.

अनेकांनी मातोश्रीवर येण्यास सुरूवात केली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगतात. आज ते आम्ही लढायला तयार आहोत हे सांगत आहेत. हिंमत असती तर त्यांनी बंड केलं नसतं. २० तारखेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं कुरबूर कसली करताय ही घ्या वर्षाची चावी, आजपासून तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. पण रडगाणं केलं. पण बंड करायला दुसऱ्या राज्यात गेला. ठाण्यात, मुंबईत महाराष्ट्रात केला असता. निवडणुकीला सामोरे जाण्याची, राजीनामा देण्याची नैतिकचाही निघून गेली. दोन शूरवीर लढा देऊन सूरतेवरून आल्यावर ते बाकीचे कुठे गेले गुवाहाटीला, असंही त्यांनी नमूद केलं.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे