शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

...यामागे 'मी पुन्हा येईन' म्हणतात ते आहेत का?; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:10 IST

नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य.

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

ज्या ठिकाणी मी जातोय तिथे प्रत्येक शिवसैनिक त्या परिस्थितीकडे संकट म्हणून पाहित नाही, तर संधी म्हणून पाहतोय. घाण निघून गेली आता चांगलं काही घडवू शकू. पावसाळ्यापूर्वी मुंबईतली महापालिकेची सवय आहे. रस्त्यांवरील कचरा बाजूला काढतो. नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. काल परवा व्हिडीओ पाहिला जे जे आमदार इकडून गेलेत त्यांना हाताला मानेला पकडून नेलंय याचं वाईट वाटतंय. तिकडे नेऊन असे हाल होतात. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे का? कोणता दुसरा पक्ष आहे का? किंवा जे पुन्हा येईन पुन्हा येईन बोलतात ते आहेत का? कोणी याच्या मागे असलं तर तरी महाराष्ट्र माफ करणार नाही किंवा झुकणार नाही, असं ही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंड आणि त्याचं कुरबूर आम्हाला आधीपासून लागली होती. काय नक्की चाललंय हा विचार करण्यासारखं आहे. २० जूनला काही आमदार पळवले आणि काही फसले. गुवाहाटी आणि सूरतला गेल्यावर कैद्यांसारखी परिस्थिती झाली आहे. ठाण्यापासून सुरूवात करायची झाली, आपण मोठे नेते आहोत दादागिरी करत आहोत, दादागिरीनं मनं किंवा लोकांना जिंकू शकत नाही. आज हिंदुत्व, शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनदं दिघेंबद्दल बोलताय हिच निष्ठा, हिंमत, हेच शिवसेनेचं रक्त असतं, कुठे कुठून नेलं आहे तर पहिलं गोष्ट तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय याचा आनंद झाला असता, असंही ते म्हणाले.

अनेकांनी मातोश्रीवर येण्यास सुरूवात केली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगतात. आज ते आम्ही लढायला तयार आहोत हे सांगत आहेत. हिंमत असती तर त्यांनी बंड केलं नसतं. २० तारखेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं कुरबूर कसली करताय ही घ्या वर्षाची चावी, आजपासून तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. पण रडगाणं केलं. पण बंड करायला दुसऱ्या राज्यात गेला. ठाण्यात, मुंबईत महाराष्ट्रात केला असता. निवडणुकीला सामोरे जाण्याची, राजीनामा देण्याची नैतिकचाही निघून गेली. दोन शूरवीर लढा देऊन सूरतेवरून आल्यावर ते बाकीचे कुठे गेले गुवाहाटीला, असंही त्यांनी नमूद केलं.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे