शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 19:26 IST

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

ठळक मुद्देफडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांना या विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. ''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, अशी टीका अमृता यांनी केली होती.

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेली रेशमी किड्याची उपमा फारच झोंबली आहे. अमृता यांना प्रत्यूत्तर दिल्यानंतर शिवसेनेने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच पत्र लिहिले असून फडणवीस पती-पत्नीला वेळीच आवरण्याचा इशारा दिला आहे. 

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. शिवसेनेनं यावर अद्याप चुप्पी साधली होती. मात्र, आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरुन फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच, या विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले होते. आता, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. 

तुमच्या ''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्व आयतं मिळाल्याचं म्हटलंय. तर, देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून वाद सुरू झाला असून आदित्य ठाकरेंच्या आईचे नाव रश्मी असल्याने अमृता यांनी ही खालच्या स्तरावरील टीका केल्याचा निषेध शिवसेनेने केला.

 

तसेच शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी थेट संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनाच पत्र लिहून देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांना राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा असा इशारा दिला आहे. त्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत. शिवसेना भाजपा युती तुटण्य़ाला फडणवीसांची अरेरावीच कारण आहे. अतिआत्मविश्वास त्यांना नडला. अमृता फडणवीसांचे ट्वीट अशोभनीय असून पती पत्नीच्या नात्याला, संस्कृतीला धक्का देणारे आहे. अमृता यांना भाजपाच ताब्यात घ्यायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

यावेळी त्यांनी अमित शहा, नितीन गडकरी आणि मोदींच्या पत्नीचा दाखला दिला. त्यांच्या पत्नी अशी वक्तव्ये कधीच करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं कधी ऐकले नाही. अमृता यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं, असा इशाराही त्यांनी जोशी यांना दिला आहे. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाHinduहिंदू