शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं लॉजिक चालणार नाही, कायदा चालेल; शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:49 IST

सुप्रीम कोर्टात आज जे काही घडले ते ऐकून सत्ताधारी वर्गात खळबळ माजली आहे. प्रत्येक निर्णय दिल्लीला विचारून केले जात आहे. असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला.

मुंबई - आमच्या माथेरानच्या शिवसैनिकावर जो हल्ला झाला त्याच्या मारेकऱ्यांना आजही पकडले नाही. नावे देऊनही, वाहन सीसीटीव्हीत कैद असूनही तेही जप्त केले जात नाही. ठाणे, डोंबिवली, उल्हासनगरात आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण होते. २००-४०० लोकं घुसून महिलांवर हात उचलला जातो. ज्यांना मारहाण होतेय त्यांच्यावरच खटले भरले जात आहे. कायद्याचे उल्लंघन होतं. कायद्यासमोर कुणीही मोठा नाही असं शिवसेना प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. 

अरविंद सावंत म्हणाले की, सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या वकिलांनी जो युक्तिवाद मांडला त्याला लॉजिकने उत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या वकिलांनी केला. परंतु कोर्टात लॉजिक चालत नाही, कायदा चालतो. १० दिवस गेले त्यात तुम्ही काय केले? असं कोर्टानं म्हटलं. निवेदन देण्यास कोर्टाने सांगितले. त्यानंतर शिंदे गटाने निवेदन दिले. सरन्यायाधीशांनी खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा विचार केला आहे. सोमवारी याबाबत सुनावणीत जे काही असेल ते पुढे येईल अशी माहिती सावंत यांनी दिली. 

आम्हाला न्याय मिळेल - प्रियंका चर्तेुवेदी सुप्रीम कोर्टात शिवसेनेने बंडखोरीबाबत युक्तिवाद केला. तुम्ही पक्षातून बाहेर पडला नाही मग निवडणूक आयोगाकडे का गेला? सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल. सोमवारी घटनापीठाकडे प्रकरण वर्ग होणार की नाही ते कळेल. ज्यांनी पक्षासोबत गद्दारी केली, विधिमंडळाचं बहुमत असल्याने पक्ष आपलाच असल्याचा दावा कायद्यालाही मंजूर नाही. सुप्रीम कोर्टात आज जे काही घडले ते ऐकून सत्ताधारी वर्गात खळबळ माजली आहे. प्रत्येक निर्णय दिल्लीला विचारून केले जात आहे. दोन लोकांनी मिळून राज्य कारभार हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय घेऊ नका अशी सूचना दिली आहे असं खासदार प्रियंका चर्तेुवेदी यांनी सांगितले

तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी घाई का केली. सध्या जे सरकार आहे ते जनतेच्या भल्याचं नाही. जनता या सर्व गोष्टीकडे पाहत आहे. निवडणुका येतील तेव्हा जनता आमच्यासोबत आहे की गद्दारांसोबत ते कळेल असंही प्रियंका चर्तेुवेदी म्हणाल्या. गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी बाजू मांडली. पक्षांतरबंदी कायदा अशापद्धतीने वापरता येणार नाही. अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असेल तर कारवाई होऊ शकत नाही असं साळवे म्हणाले. मग व्हिपचा अर्थ काय? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. अध्यक्षांविरोधात नेहमी आरोप होतात हे काही वेगळे नाही. कोर्टाच्या स्थगितीमुळे अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही. परंतु आम्ही पक्षच सोडला नाही मग अपात्र कसे होऊ शकतो असा युक्तिवाद साळवेंनी केला. राजकीय पक्षांना पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं. प्रकरण घटनापीठाकडे देण्याची गरज नाही असं कपिल सिब्बल म्हणाले त्यावर आम्ही याबाबत विचार करू असं कोर्टाने सांगितले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय