शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार? मुंबईत लोकल पुन्हा केव्हा धावणार? आदित्य ठाकरेंनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:28 IST

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार आहे का? राज्यात कशी तयारी सुरू आहे? मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेन्स केव्हा सुरू होतील? या प्रश्नांवर काय म्हणाले आदित्य ठाकरे, जाणून घ्या...

मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना, आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स, या तीन गोष्टींवर लक्ष दिले आहे, असे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनसंदर्भातही भाष्य केले.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार आहे का? राज्यात कशी तयारी सुरू आहे? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, ''अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात आम्ही लोकांकडून फिडबॅकदेखील घेत आहोत. मात्र, आता कोरोना लाट संपली असे कुणीही समजू नये. आपण असाच विचार करायला हवा, की भलेही आंकडे कमी झाले असतील, मात्र, दुसरी लाट संपलेली नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी आपल्याला आणि संपूर्ण जगाला अद्याप आणखी वेळ लागणार आहे.''

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

याच बरोबर, ''आपण  जेव्हा कोरनावर नियंत्रण मिळवत पुढे जातो, तेव्हा अर्थव्यवस्थाही चालायला हवी. लॉकडाउनपासून आम्ही बिगीन अगेनकडे वाटचाल करत आहोत. मात्र, अशात लोकांनी मास्क लवणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे, आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, यावरही लक्ष द्यायला हवे. कारण याच गोष्टी आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात. लसीकरणही सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही सुरक्षित राहणे आवश्यक आहे.''

तिसऱ्या लाटेसंदर्भात ठाकरे म्हणाले, ''यासाठी आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स, या तीन गोष्टींवर लक्ष दिले आहे. मेडिकल रिस्पॉन्समध्ये आम्ही बेड्सची संख्या वाढवत आहोत. औषधी, लशी आणि आयसीयू वाढवत आहोत. मुलांसाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात टास्क फोर्स तयार करण्यात आला. कॉर्पोरेट रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास त्यांनी बरीच मदत केली आहे. मात्र, आता स्वतःच्या जबाबदारीकडेही पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्याला कोरोना झाल्यास कसा सामना करावा. सिविक रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, अनलॉक कसे होईल, दुकानं कशी उघडली जातील. य सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देत आहोत.''

मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

याशिवाय, मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेन्स केव्हा सुरू होतील? असे विचारले असता, "कोरोनाचे आकडे कमी झाल्यानंतर आम्ही असे वागू लागलो, की आता कोरोना संपलाच आहे. मात्र, लोकल ट्रेनसंदर्भात बोलायचे, तर हा निर्णय आम्ही आता घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी, आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे लागेल. यासंदर्भात जेव्हा मेडिकल टास्क फोर्स सांगेल, तेव्हाच यावर निर्णय घेतला येईल,'' असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईlocalलोकल