शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गृहखातं शिवसेनेलाच; राष्ट्रवादीची अर्थ खात्यावर बोळवण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 12:52 IST

शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - राज्यातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देता त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असा कल विधानसभा निवडणुकीत दिला. अशा स्थितीत सोबत निवडणूक लढलेले शिवसेना-भाजप सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून एकमत न झाल्याने युती फिस्कटली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. मात्र या सरकारचे अद्याप मंत्रीपद वाटपावरून एकमत झाले नसून त्यामुळे खातेवाटप रखडले आहे. मात्र ज्या मंत्रीपदावरून गाडी अडली होती, ते गृहमंत्रीपद अखेर शिवसेनेला मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मंत्रीपदांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र खातेवाटप कसं राहिल हे निश्चित नव्हते. राज्याच्या गृहमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. आता गृहमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचे समजते. गृहखात्यासाठी राष्ट्रवादी पक्ष आग्रही होता. आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडेच गृहखातं होते. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीकडे राहिल अशी चर्चा होती. 

दरम्यान शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. गृहखात्याचा निकाल लागल्यामुळे आता उर्वरित खातेवाटप लवकरच होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.