शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शिवसेनेकडून राहुल गांधींचे कौतुक, अयोध्येतील निकालानंतर 'सामना' रंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 08:01 IST

बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात.

मुंबई - राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी भाजपा आणि शिवसेनेतील वाद देशाच्या चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजपाने सर्वात मोठा पक्ष असतानाही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगत, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 27 वर्षांपासून सुरु असलेल्या राम मंदिराच्या न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद संपुष्टात आला आहे. मात्र, या राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, हा निकाल आला. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सावध भूमिका घेत, या निकालाचे स्वागत करण्यात आले. आता, या निकालानंतर शिवसेनेनं राहुल गांधींचं कौतुक केलं असून पंतप्रधान मोदींचा उल्लेखही केला नाही.

'आपल्या मित्रपक्षाला आणि विशेषत: त्यातील काही निवडक नेत्यांना प्रचंड अहंकाराने पछाडले असून, शिवसेनेचा केवळ वापर करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका करतानाच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर, खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस राज्यातील जनतेच्या विरोधी नाही, असे म्हणत काँग्रेसचे गोडवे गायले आहेत. त्यानंतर, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून आज राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांचं कौतुक करण्यात आलंय. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा उल्लेखही करण्यात आला नाही. 

बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचे स्वागत केले. अयोध्येचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याचे स्वागत करू असे राहुल गांधी म्हणाले. हा सामंजसपणा आहे, हा सामंजसपणा औवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हरकत नव्हती, असे म्हणत सामनातून राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेखही सामनातून करण्यात आला नाही. उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून मोदी सरकारकडे राम मंदिराची मागणी अनेकदा केली आहे. पण, निकालानंतर मोदींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन होऊन, सरकार बनेल, अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यात, एनडीए सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलंय.  

बहुमत सिद्ध करूभाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्याने दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केले आहे. बहुमत सिद्ध करण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी