शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेने रोखला; आता राणेंना मंत्री करण्यासही विरोध

By यदू जोशी | Updated: November 25, 2017 06:51 IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याकरिता काल ‘मातोश्री’ गाठून शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचे साकडे घातले होते. नारायण राणे उमेदवार नसतील या अटीवर पाठिंबा देण्याची तयारीठाकरे यांनी दर्शविली होती. त्यावर राणे आमचे उमेदवार नसतील, असा निर्वाळा पाटील-तावडे यांनी दिल्याने पाठिंब्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, ‘राणेंना मंत्रीदेखील करू नका’ असे ठाकरे यांनी या दोन्ही मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत बजावले.‘मातोश्री’वरील या घडामोडीनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राणेंना मंत्री करण्यास उद्धव यांचा सक्त विरोध असल्याचे तावडे-पाटील यांनी सांगितल्यानंतर मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला.शिवसेनेचा विरोध पत्करून राणेंना मंत्री करण्याची घाई करू नये, असा भाजपाच्या नेत्यांचा बैठकीत सूर होता. अधिवेशन सुरळीत पार पाडायचे तर शिवसेनेचा विरोध परवडणार नाही. शिवाय, सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी शिवसेनेच्या विरोधाने विरोधकांना बळ मिळेल. तेव्हा विस्तार नंतरही करता येऊ शकेल, तोवर शिवसेनेचे मन वळविता येऊ शकेल, असे मत भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.>...तर वातावरण अधिक खराब होईल!सध्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत. या परिस्थितीत ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीच तोफ डागली गेली तर वातावरण अधिक खराब होईल. हा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा, असे मत बहुतेकांनी मांडले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा