शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:13 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो पदयात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर आता पंतप्रधानपदाबाबत २०२४ नंतर ठरवू. पण जनतेची इच्छा असेल, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावे लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला. 

“कलम ३७० हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते कलम काश्मीरमधून हटवण्यात आलं. ज्या कलमाचा काश्मीरमध्ये काँग्रेसने पुरस्कार केला होता, त्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेच्या लोकांनी जाऊन भेटणं यासारखा बाळासाहेबांचा अपमान होऊ शकत नाही,” असं केसरकर म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

“आम्ही अनेक ठिकाणी गेल्यानंतर ते गोमुत्र शिंपडून जमीन साफ करतात. त्याऐवजी जे लोक जाऊन आलेत त्यांचं शुद्धीकरण केलं पाहिजे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं, मला एक दिवस मला पंतप्रधान करा, मी ३७० कलम हटवून दाखवतो असं म्हणणारे बाळासाहेब कुठे. सत्तेसाठी काँग्रेसच्या मागून धावणारे आपल्याला शिवसैनिक म्हणवणारे कुठे हा खरा प्रश्न आहे. म्हणून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांसोबत गेलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी