शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांच्या मनधरणीसाठी खोतकरांना यावं लागलं; औरंगाबादेत शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 14:54 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तारांना मंत्रीपदही दिले. मात्र स्थानिक नेते आणि सत्तार यांच्यात सुसुत्रता दिसत नाही. किंबहुना सत्तारांची नाराजी त्यामुळं तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होतं. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार होतच पक्षांतर्गत भांड्याला भांडे लागण्यास सुरुवात झाली आहे. आधी राष्ट्रवादी आणि आता शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडली आहे. या घटनेमुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर तातडीने सत्तारांची समजूत काढण्यासाठी औरंगाबादेत दाखल झाले होते. त्याचवेळी औरंगाबादेतील नेते सत्तारांची मनधारणी करण्यासाठी का गेले नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे औरंगाबादेत शिवसेनेमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावरून सत्तार नाराज असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद द्यायला नको, शिवसेनेचे स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे आणि राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्रीपद हवंय यावरून सत्तार नाराज असल्याची शक्यता आहे. औरंगाबादेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे हे शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. मात्र यांच्यापैकी कोणीही सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तारांना मंत्रीपदही दिले. मात्र स्थानिक नेते आणि सत्तार यांच्यात सुसुत्रता दिसत नाही. किंबहुना सत्तारांची नाराजी त्यामुळं तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.