शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, भाजपने आता २०२९ ची तयारी करावी”; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:54 IST

विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या उद्घाटन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले गुड गव्हर्नन्स?

मुंबई: सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. उलट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असून, राजकीय वर्तुळात मोठा धुरळा उडू शकतो, असे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली असून, भाजपवाल्यांनी आता २०२९ ची तयारी करावी, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे नेते नितेश राणे, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासहीत भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंत्र्यांचा उल्लेख करत शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेने, देवाच्या चरणी तरी खरे बोला, असा खोचक टोला लगावला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. 

देवेंद्र फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का? नारायण राणे यांच्यापासून अनेक नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अनधिकृत इमले उभारून कायदे धाब्यावर बसवले आहेत. मारताय त्यावर तुमचे नौटंकी छाप हातोडे? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची वक्तव्ये व अशा हातोड्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है!, अशा इशारा शिवसेनेने दिलाय.

भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा

देशातील भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पाहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल. उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. 

दरम्यान, शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याआधी विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले आले गुड गव्हर्नन्स? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? अशी विचारणा यावेळी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा