शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 15:35 IST

अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे.

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्या पाठिशी ताकद उभी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिवसेनेचे पारडे जड दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली अभद्र युती अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपला आणि विशेष करून रावसाहेब दानवे यांना जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत भावाला जिल्हा परिषद अध्यक्ष केले. तर औरंगाबादमध्ये देखील शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसला जवळ करून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

भाजपच्या नुकत्याच झालेल्या शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. शिवसेनेला मदत करण्यासाठी कधीही तयार आहोत. परंतु, आधी शिवसेनेने जालना आणि औरंगाबादमधील काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे अंबादास दानवे- बाबुराव कुलकर्णी लढत एकतर्फी वाटत असली तरी चुरशीची होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे कुलकर्णी आपल्या पद्धतीने मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात त्यांना किती यश येते हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.