शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 15:35 IST

अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे.

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्या पाठिशी ताकद उभी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिवसेनेचे पारडे जड दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली अभद्र युती अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपला आणि विशेष करून रावसाहेब दानवे यांना जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत भावाला जिल्हा परिषद अध्यक्ष केले. तर औरंगाबादमध्ये देखील शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसला जवळ करून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

भाजपच्या नुकत्याच झालेल्या शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. शिवसेनेला मदत करण्यासाठी कधीही तयार आहोत. परंतु, आधी शिवसेनेने जालना आणि औरंगाबादमधील काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे अंबादास दानवे- बाबुराव कुलकर्णी लढत एकतर्फी वाटत असली तरी चुरशीची होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे कुलकर्णी आपल्या पद्धतीने मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात त्यांना किती यश येते हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.