शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:58 IST

सत्तेचा तिढा सुटेना : गुंडांकडून आमदारांवर दबाव, संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : शिवसेनेकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि शिवतिर्थावर शपथविधी होईल, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. त्यामुळे महायुतीतील तणाव कायमच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भाजपने शपथविधीसाठी वानखेडे स्टेडीयमवर तयारी चालविल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राऊत म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील इच्छा आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवाजी पार्कात शपथविधी पार पडेल, असे राऊत म्हणाले.शिवसेना कोणाच्या पाठिंब्यावर सरकार बनवणार असा प्रश्न विचारला असता, सत्तेचे गणित जमले की लवकरच आम्ही ते माध्यमांसमोर मांडू, असे सांगत याबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले. मात्र, सत्तेच्या वाटपाबाबत माध्यमात ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत.अमित शाह यांच्यासोबतचे संबंध मधुरच

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे काळाची पावले ओळखणारे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्र्वी परिस्थिती ओळखूनच त्यांनी युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शाह यांचे मौन रहस्यमय आहे. हरियाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. मात्र, महाराष्ट्राबाबतची त्यांची भूमिका रहस्यमय असल्याचे सांगतानाच शाह आणि शिवसेनेचे संबंध मधुर असल्याचेही राऊत म्हणाले. सरकार बनवण्यासाठी ज्या-ज्या सरकारने ईडीचा वापर केला आहे, त्यावर हा निर्णय बूमरँग झाला आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदांवर बसले आहेत. त्यांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. कोण, कुठे भेटत आहे, कसा दबाव आणत आहेत याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. या गुंडागर्दीचा लवकरच गौप्यस्फोट करू. भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ््यांपेक्षाही घाणेरडे बनले आहे, अशी टीकासुद्धा राऊत यांनी केली.‘शरद पवार राज्यात येणार नाहीत’शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच पवार भेटीबाबत राऊत म्हणाले की, पवार मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहेत. ते राज्याच्या राजकारणात येणार नाहीत. जेव्हा अशाप्रकारची राजकीय परिस्थिती उद्भवते त्यावेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात. आम्ही घेतले तर काय चुकले?चर्चा होईल ती फक्त मुख्यमंत्रिपदावरचशिवसेना आणि भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होईल. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण चालत नाही.- खा. संजय राऊतभूमिकांवर दोघेही ठामभाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे आणि शिवसेनेला ते अडीच -अडीच वर्षे विभागून हवे आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर एकदम ठाम असल्याने सत्ता वाटपाचा तिढा सुटता सुटेना असे चित्र रविवारीदेखील कायम राहिले.‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते - उद्धव ठाकरेपरतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांवर एकप्रकारे राजकीय कोटी केली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMLAआमदार