शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा; महायुतीतील तणाव कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:58 IST

सत्तेचा तिढा सुटेना : गुंडांकडून आमदारांवर दबाव, संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : शिवसेनेकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि शिवतिर्थावर शपथविधी होईल, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. त्यामुळे महायुतीतील तणाव कायमच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भाजपने शपथविधीसाठी वानखेडे स्टेडीयमवर तयारी चालविल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राऊत म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील इच्छा आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवाजी पार्कात शपथविधी पार पडेल, असे राऊत म्हणाले.शिवसेना कोणाच्या पाठिंब्यावर सरकार बनवणार असा प्रश्न विचारला असता, सत्तेचे गणित जमले की लवकरच आम्ही ते माध्यमांसमोर मांडू, असे सांगत याबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले. मात्र, सत्तेच्या वाटपाबाबत माध्यमात ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत.अमित शाह यांच्यासोबतचे संबंध मधुरच

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे काळाची पावले ओळखणारे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्र्वी परिस्थिती ओळखूनच त्यांनी युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शाह यांचे मौन रहस्यमय आहे. हरियाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. मात्र, महाराष्ट्राबाबतची त्यांची भूमिका रहस्यमय असल्याचे सांगतानाच शाह आणि शिवसेनेचे संबंध मधुर असल्याचेही राऊत म्हणाले. सरकार बनवण्यासाठी ज्या-ज्या सरकारने ईडीचा वापर केला आहे, त्यावर हा निर्णय बूमरँग झाला आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदांवर बसले आहेत. त्यांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. कोण, कुठे भेटत आहे, कसा दबाव आणत आहेत याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. या गुंडागर्दीचा लवकरच गौप्यस्फोट करू. भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ््यांपेक्षाही घाणेरडे बनले आहे, अशी टीकासुद्धा राऊत यांनी केली.‘शरद पवार राज्यात येणार नाहीत’शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच पवार भेटीबाबत राऊत म्हणाले की, पवार मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहेत. ते राज्याच्या राजकारणात येणार नाहीत. जेव्हा अशाप्रकारची राजकीय परिस्थिती उद्भवते त्यावेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात. आम्ही घेतले तर काय चुकले?चर्चा होईल ती फक्त मुख्यमंत्रिपदावरचशिवसेना आणि भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होईल. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण चालत नाही.- खा. संजय राऊतभूमिकांवर दोघेही ठामभाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे आणि शिवसेनेला ते अडीच -अडीच वर्षे विभागून हवे आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर एकदम ठाम असल्याने सत्ता वाटपाचा तिढा सुटता सुटेना असे चित्र रविवारीदेखील कायम राहिले.‘मी पुन्हा येईन’ म्हटले की, भीती वाटते - उद्धव ठाकरेपरतीचा पाऊस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले की, भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत लगावला. विधानसभा रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. ठाकरे यांनी परतीचा पाऊस आणि फडणवीस यांच्या त्या शब्दांवर एकप्रकारे राजकीय कोटी केली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMLAआमदार